मुंबई : राणा दाम्पत्याच्या भुमिकेला भाजपचा पाठिंबा असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच कोणाच्या तरी पाठिंब्याने तुम्ही मुंबई येऊन मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक काय शांत बसणार आहेत का? असा कडक इशारा संजय राऊत यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना दिला आहे.
“हनुमान चालिसाचं पठण झाल्यानंतर शिवसैनिकांकडून प्रसाद दिला जाईल”
राणा दाम्पत्य सध्या मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबईत सध्या राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणावर चिघळली आहे. मातोश्रीसमोर राणा दाम्पत्यांविरोधात शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी दिली जात आहे. राणा दाम्पत्यांवर सध्या राजकीय नेते कडाडून टिका करीत आहेत. यावर संजय राऊतांनी देखील त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
“शिवसैनिक माझं काही बिघडवू शकत नाही, उद्या 9 वाजता मातोश्रीवर जाणारच”
संजय राऊत म्हणाले की, कायदा-सुव्यवस्थेबाबत तुमच्याकडून सल्ले ऐकुन घ्यावेत, अशी वेळ सरकारवर आलेली नाही. तुम्ही तुमच्या पात्रतेत राहा. तसेच अंत पाहू नका, अशा कडक इशारा देखील संजय राऊत यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना दिला आहे.
“हनुमान चालिसा हे भाजपचे अभियान नाही”; प्रवीण दरेकाराचं स्पष्टीकरण
माझं आताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट, ईडी आणि सीबीआय या सगळ्याच्या पलीकडे गेलो आहोत. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं एक अजरामर वाक्य आहे, आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही. सत्ता आमच्यासाठी जन्माला आली आहे. सत्ता ही फक्त खुर्चीची नसते. शिवसेना हीच एक सत्ता आहे आणि या सत्तेचे चटके आतापर्यंत अनेकांनी घेतले आहेत. तुम्हालाही घ्यायचा असेल तर घ्या, असंही संजय राऊत म्हणालेत.
Read also:
- तर नवनीत राणा यांना महाराष्ट्रातून तडीपार करा..; रिपाइंची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
- मंत्र्यांच्या सरकारी लुटीवरच्या प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, म्हणाले..;
- गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दिलासा; सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी जामीन अर्ज मंजूर
- “टिंगल केली तरी, पाच हजार वर्षाची परंपरा सोडणार नाही”; चंद्रकांत पाटलांनी केला ‘त्या’ वक्तव्यावर पुनर्रच्चार
- बुथवर वावर ठेवायला हवा, कोल्हापूरात 2 खासदार निवडून आलेच पाहिजे; जयंत पाटलांचा निर्धार