पुणे : ‘व्हाय आय किल्ड गांधी’चित्रपटातील वादग्रस्त भूमिकेमुळे चर्चेत आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अमोल कोल्हे आहेत तरी कुठे? असा प्रश्न शिरुर लोकसभा मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. कारण २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत निवडूण आल्यानंतर शिरुरमधील नागरिकांना डॉ. कोल्हेंकडून खुप अपेक्षा होत्या. विकासकामांसोबतच शिरुरमधील अस्मिता असलेली शिवनेरी किल्ला परिसराचा विकास, बैलगाडा शर्यंतींसाठीचा पाठपुरावा यासह खेडमधील प्रस्तावित विमानतळ, इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प आणि अत्यंत चर्चेत असलेला जुन्नरचा बिबट सफारी पार्क आदी विविध मुद्यांवर डॉ. कोल्हे यांची भूमिका संदिग्ध राहिली. त्यातच महात्मा गांधी यांचे मारेकरी नथूराम गोडसे यांची भूमिका साकारत डॉ. कोल्हे यांनी पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेचा रोष ओढावून घेतला. तत्पूर्वी, जुन्नरला कत्तलखाना उभारण्यासाठी दिलेला निधी यावरुनही शिवप्रेमींनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय.
गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दिलासा; सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी जामीन अर्ज मंजूर
वास्तविक, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची भूमिका साकारल्यामुळे डॉ. कोल्हे यांना अफाट प्रसिद्धी मिळालीय. शिव-शंभूप्रेमींनी डॉ. कोल्हे यांना अक्षरश: डोक्यावर घेतले. मात्र, डॉ. कोल्हे यांचे मतदार संघाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप अनेकदा विरोधकांसह राष्ट्रवादीतील आमदारांनी केलाय. खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप मोहिते यांनीतर जाहीर सभेत डॉ. कोल्हे यांना खडेबोल सुनावले होते. यानंतर कोल्हेंनी खेडमध्ये जनसंपर्क कार्यालय सुरू करुन चूक सुधारण्याचा प्रयत्न केला.
आता डॉ. कोल्हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जुन्नर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. तब्बल ४९४ कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्धाटन, भूमिपूजनही करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार स्वत: कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमाला डॉ. कोल्हे अनुपस्थितीत होते. यापूर्वी, शिवजन्मोत्सव कार्यक्रमाला शिवनेरीवर कोल्हे दिसते नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित अनेक कार्यक्रमांना डॉ. कोल्हे व्यस्त असतात. मग, कोल्हे आहेत तरी कुठे? असा सवाल उपस्थित केला जातोय.
बुथवर वावर ठेवायला हवा, कोल्हापूरात 2 खासदार निवडून आलेच पाहिजे; जयंत पाटलांचा निर्धार
शिवराय केवळ मतांसाठी आठवतात काय?
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मते मागायची. अभिनय करुन वारेमाप प्रसिद्धी मिळवायची आणि शिव-शुंभराजांच्या संबंधित कार्यक्रमांना गैरहजेरी लावायची, अशी दुटप्पी भूमिका खासदार डॉ. अमोल कोल्हे घेत आहेत. फुले-शाहु-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र… अशा गर्जना सभांमध्ये करायच्या आणि महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेंची भूमिका पडद्यावर साकारायची… असा विरोधाभास डॉ. कोल्हे यांच्याकडून कदपि अभिप्रेत नाही. डॉ. कोल्हे शुभूराजा- शिवरायांच्या भूमिकांमुळे घराघरांत पोहोचले मात्र, आता कोल्हे यांना शिवराय केवळ मतांसाठी आठवतात का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Read also:
- पोलिसांच्या सहकार्याने सरकारने उच्छाद मांडला; मोहित कंबोज हल्लाप्रकरणी दरेकर भडकले
- “कशाला कुणाला खिजवता? नाहीतर ते महाप्रसाद देण्याची वाट पाहत आहेत”; भुजबळांचा राणांना सुचक इशारा
- सत्तेचे चटके अनेकांनी घेतलेय, तुम्हालाही घ्यायचा असेल तर..; राऊतांचा कडक इशारा
- तर नवनीत राणा यांना महाराष्ट्रातून तडीपार करा..; रिपाइंची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
- मंत्र्यांच्या सरकारी लुटीवरच्या प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, म्हणाले..;