मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण राणा दाम्पत्यामुळे जोरदार चर्चेत आलं आहे. राणा दाम्पत्यांनी घेतलेल्या भुमिकेवर राज्यातील नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भाजप नेते मोहित कंबोज हे मातोश्री परिसरात रेकी कऱण्यासाठी आले असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर काल शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
यावर भाजपने आज पत्रकार परिषेद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. राज्यातील कायदा सुवस्था ढासळीय. कायदा हातात घेण्याचे काम सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेचे करत आहेत. मोहित कंबोज यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. दहशत माजवली जात आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुववस्था बिघडली आहे. त्यासंदर्भात आम्ही मुंबई पोलिसांना निवेदन देणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
बुथवर वावर ठेवायला हवा, कोल्हापूरात 2 खासदार निवडून आलेच पाहिजे; जयंत पाटलांचा निर्धार
शिवसेना कार्यकर्त्यांकडून हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. राज्यात गुंडगिरी सुरू आहे. मुख्यमंत्रीही मूग गिळून बसले आहेत. दहशत माजवल्यास आम्हीही जशास तसे उत्तर देऊ. पोलिसांच्या सहकार्याने सरकारने उच्छाद मांडला. शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेते दहशत आणि गुंडागिरीचं समर्थन करत असल्याचा आरोप देखील प्रवीण दरेकरांनी केला आहे.
“हनुमान चालिसाचं पठण झाल्यानंतर शिवसैनिकांकडून प्रसाद दिला जाईल”
दरम्यान, राज्यातील कायदा सुवस्थेची स्थिती मोडकळीस आली आहे. राज्यात पक्षपात केला जात आहे. धनंजय मुंडेप्रकरणी वेगळा न्याय आणि गणेश नाईकांवर कारवाई केली जात आहे. गृहविभागाकडून राज्यात पक्षपात केला जात असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील केला आहे.
Read also:
- “कशाला कुणाला खिजवता? नाहीतर ते महाप्रसाद देण्याची वाट पाहत आहेत”; भुजबळांचा राणांना सुचक इशारा
- सत्तेचे चटके अनेकांनी घेतलेय, तुम्हालाही घ्यायचा असेल तर..; राऊतांचा कडक इशारा
- तर नवनीत राणा यांना महाराष्ट्रातून तडीपार करा..; रिपाइंची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
- मंत्र्यांच्या सरकारी लुटीवरच्या प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, म्हणाले..;
- गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दिलासा; सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी जामीन अर्ज मंजूर