मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळ शिवसैनिकांनी रात्री हल्ला केला. तसेच राणा दाम्पत्यांनी घेतलेल्या भुमिकेवर राज्यातील नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भाजप नेते मोहित कंबोज हे मातोश्री परिसरात रेकी कऱण्यासाठी आले असल्याचा आरोप केला. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर सडकून टिका केली.
मंत्र्यांच्या सरकारी लुटीवरच्या प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, म्हणाले..;
ते म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री सांगताहेत की, राज्यात कायदा सुव्यस्था बिघडली आहे. मग तुम्ही काय चपात्या भाजताय ? जमत नसेल तर राजीनामा द्या, शिवसेना बसलीच आहे आपला गृहमंत्री बसवायला. स्वतः काम करायचंच नाही आणि जे काही होईल त्याचं खापर कधी मनसेवर कधी आमच्यावर फोडायचं, असा या सरकारचा कारभार आहे. असा घणाघात त्यांनी ठाकरे सरकारवर लावला.
गुणरत्ने सदावर्तेंना मोठा दिलासा; सिल्व्हर ओक हल्लाप्रकरणी जामीन अर्ज मंजूर
राणा दाम्पत्याची मागणी शिवसेनेला मान्य नाही. त्यांना हनुमान चालिसा वाचायची आहे, राक्षसस्तोत्र नाही. ठीक आहे, त्यांना हनुमान चालिसाही वाचू द्यायची नाही, तर पोलिसांद्वारे रोखा. शिवसैनिकांनी रस्त्यावर का यावं? कारवाईत पोलिस कमी पडताहेत का? की सरकारला राज्य चालवता येत नाहीये? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, मोहित भारतीय यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करीत मुख्यमंत्री शिवसेनेचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करावा? मातोश्रीसमोर जमून हुल्लडबाजी करावी? मोहित यांना काही झालं असतं तर जबाबदार कोण असतं? उद्धवजी, आवरा हे! कायदा-सुव्यवस्थेचं बघा जरा. हल्लेखोरांवर कारवाई करा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also:
- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आहेत तरी कुठे? शिवरायांच्या पुतळ्याच्याही अनावरणाला अनुपस्थिती
- पोलिसांच्या सहकार्याने सरकारने उच्छाद मांडला; मोहित कंबोज हल्लाप्रकरणी दरेकर भडकले
- “कशाला कुणाला खिजवता? नाहीतर ते महाप्रसाद देण्याची वाट पाहत आहेत”; भुजबळांचा राणांना सुचक इशारा
- सत्तेचे चटके अनेकांनी घेतलेय, तुम्हालाही घ्यायचा असेल तर..; राऊतांचा कडक इशारा
- तर नवनीत राणा यांना महाराष्ट्रातून तडीपार करा..; रिपाइंची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी