मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अखेर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा करण्याचा हट्ट मागे घेतला आहे. नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याने त्यांच्या दौऱ्यांना गालबोट लागू नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत अमरावतीला परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर हल्लाबोल केला.
पोलिसांच्या सहकार्याने सरकारने उच्छाद मांडला; मोहित कंबोज हल्लाप्रकरणी दरेकर भडकले
मागील दोन दिवसांपासून घंटाधारी बोगस हिंदुत्ववादी वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करीत होते. मुंबईत येऊन मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा वाचू, अशी भाषा त्यांनी वापरली. अमरावतीच्या बंटी बबलीने गोंधळाचा प्रयत्न केला. पंतप्रधानांच्या दौऱ्यांचं कारण सांगून त्यांनी पळ काढला. पंतप्रधानांच्या दौऱ्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. ते आमचे देखील पंतप्रधान आहेत. असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
“कशाला कुणाला खिजवता? नाहीतर ते महाप्रसाद देण्याची वाट पाहत आहेत”; भुजबळांचा राणांना सुचक इशारा
पंतप्रधानाच्या दौऱ्याचं रक्षण करण्यासाठी शिवसैनिक ठामपणे आहेत. त्यामुळे बंटी बबलीचा दावा साफ चुकीचा आहे. मला शिवसैनिकांचं आश्चार्य वाटतंय की त्यांनी आपात्कालीन परिस्थितीत त्यांच्यासाठी अॅम्बुलन्सची व्यवस्था केली होती. मानवतावादी दृष्टीकोन बघा, आणि मला आनंद वाटला. मातोश्रींवर घुसुन काही वेगळं कारस्थान रचण्याचं यांचं कारस्शान होतं. हनुमान चालिसा आपल्या घरात वाचता येते. श्रीरामाचं नाव घेण्यासाठी या बबलीचा विरोध होता. आता मोठं हिंदुत्वावर बोलताय. असंही त्यांनी म्हटलं आहे.
सत्तेचे चटके अनेकांनी घेतलेय, तुम्हालाही घ्यायचा असेल तर..; राऊतांचा कडक इशारा
दरम्यान, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली. मला आणि नवनीत राणांना विरोध करणं हे योग्य नाही. आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलं. तसेच आमच्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र केला गेला असल्याचं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. तसेच श्रीरामाचा अपमान करणारे मुख्यमंत्र्यांना रामभक्त जागा दाखवतील. हा त्यांचा प्रंचड अंहकार तो त्यांच्या डोक्यावर गेल्यामुळे घड़लं आहे. असंही ते म्हणाले.
Read also:
- राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडली, उद्यापासून आंदोलन करू; चंद्रकांत पाटलांचा एल्गार
- “श्रीरामाचा अपमान करणारे मुख्यमंत्र्यांना रामभक्त जागा दाखवतील; मोदींच्या दौऱ्यामुळे आम्ही परत अमरावतीला निघालोय
- एका जणाच्या गाडीवर वीस पंचवीस जण येत असाल, तर..; शेलारांनी दिला शिवसेनेला सज्जड दम
- …मग राज्याचे गृहमंत्री काय चपात्या भाजताय का? चंद्रकांत पाटलांचा रोखठोक सवाल
- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आहेत तरी कुठे? शिवरायांच्या पुतळ्याच्याही अनावरणाला अनुपस्थिती