मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंगे आणि आता हनुमान चालिसा यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. सुरूवातीला मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांना मुंबईत येण्याचं आव्हान दिल्यानंतर ते मुंबईत दाखल झालेत. परंतु शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांना मातोश्रीवर जाण्यापासून रोखलं. त्यानंतर आम्ही सुरक्षेच्या कारणामुळे आंदोलन मागे घेत असल्याचं आता राणा दाम्पत्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
सत्तेचे चटके अनेकांनी घेतलेय, तुम्हालाही घ्यायचा असेल तर..; राऊतांचा कडक इशारा
हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आमच्या मनात आहेत. हनुमान जंयतीच्या दिवशी चालिसा न वाचणं हे या सरकारचं पाप आहे. आमचा मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचण्याची मागणी कायम राहणार आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलिकडेच मुंबई दौरा होत असून आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं राणा दाम्पत्यांनी म्हटलं आहे.
तर नवनीत राणा यांना महाराष्ट्रातून तडीपार करा..; रिपाइंची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टिका केली. मला आणि नवनीत राणांना विरोध करणं हे योग्य नाही. आम्हाला पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलं. तसेच आमच्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र केला गेला असल्याचं आमदार रवी राणा यांनी म्हटलं आहे. तसेच श्रीरामाचा अपमान करणारे मुख्यमंत्र्यांना रामभक्त जागा दाखवतील. हा त्यांचा प्रंचड अंहकार तो त्यांच्या डोक्यावर गेल्यामुळे घड़लं आहे. असंही ते म्हणाले.
मंत्र्यांच्या सरकारी लुटीवरच्या प्रश्नावर अजित पवारांचा पारा चढला, म्हणाले..;
दरम्यान, भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर काल शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सरकारच कायदा आणि सुव्यस्था खराब करणार असेल याची कुठेतरी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सध्या हनुमान चालिसा वाद आता मोहित कंबोज हल्लापर्यंत आला आहे.
Read also:
- एका जणाच्या गाडीवर वीस पंचवीस जण येत असाल, तर..; शेलारांनी दिला शिवसेनेला सज्जड दम
- …मग राज्याचे गृहमंत्री काय चपात्या भाजताय का? चंद्रकांत पाटलांचा रोखठोक सवाल
- राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आहेत तरी कुठे? शिवरायांच्या पुतळ्याच्याही अनावरणाला अनुपस्थिती
- पोलिसांच्या सहकार्याने सरकारने उच्छाद मांडला; मोहित कंबोज हल्लाप्रकरणी दरेकर भडकले
- “कशाला कुणाला खिजवता? नाहीतर ते महाप्रसाद देण्याची वाट पाहत आहेत”; भुजबळांचा राणांना सुचक इशारा