मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या मुंबई दौरा असल्याने आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा आज राणा दाम्पत्यांनी केलं आहे. गेल्या दोन दिवसापासून मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले होते. परंतु शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने त्यांना मातोश्रीपर्यंत पोहचता आलं नाही. यावरून आता शिवसेनेकडून त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आहेत तरी कुठे? शिवरायांच्या पुतळ्याच्याही अनावरणाला अनुपस्थिती
अमरावतीच्या खासदार आणि आमदार रवी राणा यांची तीन दिवसांत नौटंकी संपली आहे. मोदींच्या दौऱ्यामुळे त्यांना कारणं मिळालं आहे. त्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतलं. मातोश्रीला आव्हान देणारी व्यक्ती अजून जन्माला आलेली नाही. नाद कुणाचाही करा. शिवसेनेचा नाद करू नका. यानिमित्ताने पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद महाराष्ट्राने पाहिली आहे. असं शिवसेनेचे नेते वरूण देसाई यांनी म्हटलं आहे.
पोलिसांच्या सहकार्याने सरकारने उच्छाद मांडला; मोहित कंबोज हल्लाप्रकरणी दरेकर भडकले
शिवसेना खासदार संजय राऊतांनी देखील याबाबत ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, हिंदुत्व काही जणांनी भाड्याने घंटा धारी हिंदुत्व स्वीकारले आहे. वाजवत बसा घंटा. शिवसेनेचे हिंदुत्व गदाधारी आहे. लक्षात ठेवा असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर कुणाच्या पाठबळाने मुंबईत येऊन मातोश्रीवर घुसण्याचा प्रयत्न करत असाल तर शिवसैनिक गप्प बसतील का? तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा. तुम्ही लक्ष्मण रेषा ओलांडू नका. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा. असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
“कशाला कुणाला खिजवता? नाहीतर ते महाप्रसाद देण्याची वाट पाहत आहेत”; भुजबळांचा राणांना सुचक इशारा
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून राज्यातील राजकारण चांगलचं पेटलं आहे. त्यामुळे काल आणि आज मुंबईत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
Read also:
- “पंतप्रधानांच्या दौऱ्यांचं कारण सांगून अमरावतीच्या बंटी बबलीने पळ काढला”
- राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडली, उद्यापासून आंदोलन करू; चंद्रकांत पाटलांचा एल्गार
- “श्रीरामाचा अपमान करणारे मुख्यमंत्र्यांना रामभक्त जागा दाखवतील; मोदींच्या दौऱ्यामुळे आम्ही परत अमरावतीला निघालोय
- एका जणाच्या गाडीवर वीस पंचवीस जण येत असाल, तर..; शेलारांनी दिला शिवसेनेला सज्जड दम
- …मग राज्याचे गृहमंत्री काय चपात्या भाजताय का? चंद्रकांत पाटलांचा रोखठोक सवाल