मुंबई : पोलीस हस्तक्षेप करून राणा दाम्पत्य खार येथून बाहेर पडत असेल तर त्यांना जाऊद्या. जर त्यांची जाण्यावाचून कुणी अडवणूक केली तर मी स्वत: त्यांच्या घरी जाणार असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. शिवसैनिकांनी दिलेलं चॅंलेज पुर्ण करण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले होते. मातोश्रींवर जाऊन आम्ही हनुमान चालिसा करणाच असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र मोदींच्या दौऱ्यामुळे आम्ही आंदोलन मागे घेत असल्याचं त्यांनी म्हटलं असून त्यांच्या निवासस्थानी आता शिवसैनिकांनी प्रंचड गर्दी केली आहे.
…मग राज्याचे गृहमंत्री काय चपात्या भाजताय का? चंद्रकांत पाटलांचा रोखठोक सवाल
राणा दाम्पत्य यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल. राज्यातील सरकारच वातावरण बिघडवत आहे. संजय राऊत आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आहे, याची माहिती आहे की नाही? सत्ताधीर नेतेच धमक्या देऊ लागल्याने राज्यात पोलिस यंत्रणा आहे की नाही असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आहेत तरी कुठे? शिवरायांच्या पुतळ्याच्याही अनावरणाला अनुपस्थिती
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टिका करताना ते म्हणाले की, कोण आहे हा ? शिवसेना सुरू झाली तेव्हा हा नव्हता. नोकरीसाठी सामनात आला आणि बिनपगारी नेता झाला. तसेच संजय राऊत चे व्हेटिंग लिस्टमध्ये नाव होते परंतु तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना खासदार केले, साहेबांनी सांगितले म्हणून मी राऊतला खासदार केले. असंही ते म्हणालेत.
पोलिसांच्या सहकार्याने सरकारने उच्छाद मांडला; मोहित कंबोज हल्लाप्रकरणी दरेकर भडकले
दरम्यान, नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर विविध मुद्यांवरून देखील घेरण्याचा प्रयत्न केला. मोहित कंबोज हल्लाप्रकरणी देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. अशातच आता राणा दाम्पत्यांनी आंदोलन मागे अमरावतीला परत जाणार असल्याचे स्पष्ट केले. परंतु खार येथील निवासस्थाना बाहेर शिवसैनिकांनी प्रंचड गर्दी केली आहे. जोपर्यंत ते माफी मागत नाही. तोपर्यंत आम्ही याठिकाणांहून जाणार नाही, असंही शिवसैनिकांनी म्हटलं आहे.
Read also:
- “नाद कुणाचाही करा, पण शिवसेनेचा नाही”; राणा दाम्पत्याला शिवसेनेचा खोचक टोला
- “पंतप्रधानांच्या दौऱ्यांचं कारण सांगून अमरावतीच्या बंटी बबलीने पळ काढला”
- राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडली, उद्यापासून आंदोलन करू; चंद्रकांत पाटलांचा एल्गार
- “श्रीरामाचा अपमान करणारे मुख्यमंत्र्यांना रामभक्त जागा दाखवतील; मोदींच्या दौऱ्यामुळे आम्ही परत अमरावतीला निघालोय
- एका जणाच्या गाडीवर वीस पंचवीस जण येत असाल, तर..; शेलारांनी दिला शिवसेनेला सज्जड दम