मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून मशिदीवरील भोंगा आणि हनुमान चालिसा यावरून राजकीय वातावरण चांगलचं पेटलं आहे. आज अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अखेर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा करण्याचा हट्ट मागे घेतला आहे. नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याने त्यांच्या दौऱ्यांना गालबोट लागू नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत अमरावतीला परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच धागा पकडत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टिका केली.
सध्या राज्यात ज्या काही घटना घडताहेत त्यांसदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी भाजपच्या पोलखोल रथावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आहे, मात्र या हल्ल्यातील आरोपी अटकेत नाही. महिला लोकप्रतिनिधीला 20 फुट गाडण्याची भाषा केली जात आहे. मात्र साधी त्यांची दखल सुद्धा घेतली नाही. तसेच हनुमान चालिस पाठणाला राणा दाम्पत्य येतात आणि त्यांना थेट अटक केली जाते असं ट्विट त्यांनी केलं आहे.
एका जणाच्या गाडीवर वीस पंचवीस जण येत असाल, तर..; शेलारांनी दिला शिवसेनेला सज्जड दम
त्यानंतर त्यांनी इतकी दंडुकेशाही, इतका अहंकार, इतका द्वेष, सत्तेचा इतका माज, सरकारच करणार हिंसाचार, एवढीच तुमची मदुर्मकी असंही म्हटलं आहे. तसेच सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, परंतु जनता सारे काही पाहते आहे. लोकशाहीत मतं मांडण्याचा अधिकार संपला. लोकशाहीचे गाऱ्हणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का? असा थेट सवाल देखील त्यांनी केला.
…मग राज्याचे गृहमंत्री काय चपात्या भाजताय का? चंद्रकांत पाटलांचा रोखठोक सवाल
दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अखेर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा करण्याचा हट्ट मागे घेतला आहे. नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असल्याने त्यांच्या दौऱ्यांना गालबोट लागू नये, म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत अमरावतीला परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगेचच पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर हल्लाबोल केला.
Read also:
- चंद्रकांत दादा कुठे दिसत नाही, कुठे हिमालयात गेले की काय? अमोल मिटकरींनी घेतला उखाणा
- “साहेबांनी सांगितले म्हणून मी राऊतांना खासदार केले”; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघात
- “नाद कुणाचाही करा, पण शिवसेनेचा नाही”; राणा दाम्पत्याला शिवसेनेचा खोचक टोला
- “पंतप्रधानांच्या दौऱ्यांचं कारण सांगून अमरावतीच्या बंटी बबलीने पळ काढला”
- राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडली, उद्यापासून आंदोलन करू; चंद्रकांत पाटलांचा एल्गार