मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांची दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर आज त्यांच्यावर वांद्रे येथील न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं रवी राणांच्या वकिलांनी म्हटलं आहे. तसेच त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
“साहेबांनी सांगितले म्हणून मी राऊतांना खासदार केले”; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघात
मुख्यमंत्रीविरोधात अपशब्द वापरल्याने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला असल्याचं सरकारी वकिल अॅड वकिल प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे. शांतता राखून त्यांना परतण्याची 129 कलमांर्गत पोलिसांनी नोटीस पाठवली होती. त्यामुळे राणा दाम्पत्यावर कलम 124 अ अतंर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता 27 तारखेला सरकारी पक्षाला आपली लेखी बाजू मांडण्यास न्यायालयाने सांगितलं आहे.
“नाद कुणाचाही करा, पण शिवसेनेचा नाही”; राणा दाम्पत्याला शिवसेनेचा खोचक टोला
राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नवनीत राणा यांची रवानगी भायखाळा येथील महिला कारागृहात होण्याची शक्यता आहे. त्यावर हनुमान चालिसा वाचणे पाप आहे का ? कलम 124 अ अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा लावा. देशातील आमचा प्रश्न आहे की हनुमान चालीसा पाठ करणे गुन्हा आहे , असेल तर आम्हाला फाशी द्या, असं ट्विट नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केलं आहे.
“पंतप्रधानांच्या दौऱ्यांचं कारण सांगून अमरावतीच्या बंटी बबलीने पळ काढला”
दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत निषेध व्यक्त केला आहे. राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा आरोप झाला आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन आपण आलो आहोत असा जर तुमचा गोड गैरसमज असेल तर तुम्हीही इथे आहात आणि आम्हीही इथे आहोत. ज्या दिवशी तुमच्या हातून सत्ता जाईल त्यादिवशी विनातक्रार परफेड करायला तयार राहा तीही व्याजासह असं ट्विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “सोमय्यांच्या चालकांवर गुन्हा, मात्र शिवसैनिकांवर अजूनही गुन्हा नाही”;रावसाहेब दानवे
- राजकारण तापलं! राणा दाम्पत्याला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- राणा दाम्पत्यानी पोलीस ठाण्यात 101 वेळा केलं हनुमान चालिसाचे पठण! ठाकरे सरकावर केले गंभीर आरोप
- “सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, कारण लोकशाहीत मतं मांडण्याचा तुमचा अधिकार संपला”
- चंद्रकांत दादा कुठे दिसत नाही, कुठे हिमालयात गेले की काय? अमोल मिटकरींनी घेतला उखाणा