मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना काल पोलिसांनी अटक केली. त्यांना काल पोलिसांनी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आलेे. तसेच काल रात्री भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर देखील काल काही लोकांनी हल्ला केला. हनुमान चालिसा, मशिदीवरील भोंगे आणि आता भाजप नेत्यांवर झालेले हल्ले आणि राणा दाम्पत्यामुळे राज्यातील राजकारण चांगलचं तापलं. त्यानंतर त्यांना आज् 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
“पंतप्रधानांच्या दौऱ्यांचं कारण सांगून अमरावतीच्या बंटी बबलीने पळ काढला”
नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांची दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर आज त्यांच्यावर वांद्रे येथील न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं रवी राणांच्या वकिलांनी म्हटलं आहे. येत्या 29 एप्रिलला या प्रकरणाची पूढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.
राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडली, उद्यापासून आंदोलन करू; चंद्रकांत पाटलांचा एल्गार
सरकारी वकिलांनी त्यांच्यावर आयपीसी 153 ए नुसार कारवाई केली आहे. एखादी व्यक्ती समाजात द्वेष पसरणारं वक्तव्य करते, दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल, आणि त्याला चिथावणी मिळेल असं कृत्य करते त्यावेळी हे कलम लावण्यात येतं. त्याचसोबत आयपीसी 34 आणि 37 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राणांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नवनीत राणा यांनी नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे मातोश्रीवरील हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शिवसैनिकांनी माफी मागावी, यासाठी शिवसैनिकांनी खार येथील निवासस्थानी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी राणा दाम्पत्याला त्याठिकाणी बाहेर काढण्यासाठी पोलीस पोहचले. परंतु बाहेर येण्यास त्यांनी नकार दिला, परंतु त्यानंतर मग सांताक्रुझ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. कालची संपुर्ण रात्र राणा दाम्पत्यांची पोलीस ठाण्यातच गेली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली खोट्या गुन्ह्यात अटक केल्याप्रकरणी सांताक्रज पोलीस स्टेशनच्या कोठडीत 101 वेळा हनुमान चालीसाचे पठण केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मागासवर्गीय महिला आहे, म्हणून मला शिवसेनेकडून अपमानस्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्याचबरोबर ते माझ्याबद्दल खालच्या दर्जात बोलत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
Read also:
- राणा दाम्पत्यानी पोलीस ठाण्यात 101 वेळा केलं हनुमान चालिसाचे पठण! ठाकरे सरकावर केले गंभीर आरोप
- “सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, कारण लोकशाहीत मतं मांडण्याचा तुमचा अधिकार संपला”
- चंद्रकांत दादा कुठे दिसत नाही, कुठे हिमालयात गेले की काय? अमोल मिटकरींनी घेतला उखाणा
- “साहेबांनी सांगितले म्हणून मी राऊतांना खासदार केले”; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघात
- “नाद कुणाचाही करा, पण शिवसेनेचा नाही”; राणा दाम्पत्याला शिवसेनेचा खोचक टोला