मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांची दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर आज त्यांच्यावर वांद्रे येथील न्यायालयात न्यायदंडाधिकारी ए. ए. धानीवाले यांनी त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर असल्याचं रवी राणांच्या वकिलांनी म्हटलं आहे. तसेच त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे.
चंद्रकांत दादा कुठे दिसत नाही, कुठे हिमालयात गेले की काय? अमोल मिटकरींनी घेतला उखाणा
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी सगळं मंत्रिमंडळ प्रयत्न करत आहे. हे होत असताना त्यातून नवीन प्रश्न निर्माण होण्याच्या दृष्टीने काही घडू नये. तुम्ही अमरावतीचे लोकप्रतिनिधी आहात. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावना नेहमीच फार तीव्र असतात. लोक बाळासाहेबांना जाऊन भेटायचे, उद्धव ठाकरेंना जाऊन भेटतात. असंही ते म्हणालेत.
“साहेबांनी सांगितले म्हणून मी राऊतांना खासदार केले”; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघात
तुम्ही तुमचं काम करत असताना राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका. आम्ही सरकारमध्ये असलो तरी पोलिसांनी त्यांचं काम चोखपणे बजावलं पाहिजे. राजकीय हस्तक्षेप मुळीच असता कामा नये .या प्रकऱणात असं झालं असेल असं मी आजिबात म्हणत नाही. परंतु सगळ्यांनी आपापली जाबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर हे प्रश्न निर्माण होणार नाही. महाराष्ट्रातील कुठल्याही व्यक्ती राज्याबाहेर पडला तर तो सुरक्षितच आला पाहिजे. यावर कुणाचं दुमत नाही.
“नाद कुणाचाही करा, पण शिवसेनेचा नाही”; राणा दाम्पत्याला शिवसेनेचा खोचक टोला
दरम्यान, तपासादरम्यान सर्व बाहेर येईल. त्यातून मग आम्ही जो काय तो निर्णय घेऊ, असंही अजित पवार म्हणालेत. मुख्यमंत्रीविरोधात अपशब्द वापरल्याने नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला असल्याचं सरकारी वकिल अॅड वकिल प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे. शांतता राखून त्यांना परतण्याची 129 कलमांर्गत पोलिसांनी नोटीस पाठवली होती. त्यामुळे राणा दाम्पत्यावर कलम 124 अ अतंर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आता 27 तारखेला सरकारी पक्षाला आपली लेखी बाजू मांडण्यास न्यायालयाने सांगितलं आहे.
Read also:
- किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे; देवेंद्र फडणवीस
- नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल! सरकारी वकिलाची माहिती
- राजकारण तापलं! राणा दाम्पत्याला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- राणा दाम्पत्यानी पोलीस ठाण्यात 101 वेळा केलं हनुमान चालिसाचे पठण! ठाकरे सरकावर केले गंभीर आरोप
- “सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, कारण लोकशाहीत मतं मांडण्याचा तुमचा अधिकार संपला”