मुंबई : शिवसैनिकांनी केलेल्या हल्ला प्रकरणी भाजपनेते किरीट सोमय्या हे भाजपच्या शिष्टमंडळासह नवी दिल्लीत गृहसचिवाची भेट घेणार आहे. अलिकडेच त्यांच्यावर खार येथील ठिकाणी त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केली होती. त्यात ते जखमी देखील झाले होते. नवी दिल्लीत जाण्याअगोदर त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला.
“सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, कारण लोकशाहीत मतं मांडण्याचा तुमचा अधिकार संपला”
ते म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणजे माफिया सेनेचे सरदार दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी चालली आहे. त्याची आम्ही माहिती गृहसचिवांना देणार आहोत. शिवसेनेचे गुंड लोकांच्या घरात घुसतात. नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण होते. आमदार-खासदारांना तुरूंगात टाकतात. खार पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या मदतीने झेड सुरक्षा असणाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. तुझा मनसुख हिरेन करू अशा धमक्या दिल्या जातात. असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत दादा कुठे दिसत नाही, कुठे हिमालयात गेले की काय? अमोल मिटकरींनी घेतला उखाणा
किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर धक्कादायक आरोप केले. खारच्या घटनेतच यांचे 100 अपराध झाले आहेत. म्हणून या उद्धव ठाकरे यांना मी आव्हान देतो आहे. मनसुख हिरेन उद्धव ठाकरे यांनी घडवून आणला. प्रदीप शर्माची, सचिन वाझेंची नियुक्ती कोणी केली ? आणि आता उद्धव ठाकरे आम्हाला तुमचा मनसुख हिरेन करू अशी धमकी पाठवतात? अरे सात जन्म मनसुख हिरेन केला तरी या माफिया सरकारचा अंत आणणार असं आव्हान देखील त्यांनी दिलं आहे.
“साहेबांनी सांगितले म्हणून मी राऊतांना खासदार केले”; नारायण राणेंचा राऊतांवर घणाघात
दरम्यान, गेल्या मागील आठवड्यापासून ज्या पद्धतीच्या महाराष्ट्रात घटना घडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पुर्णपणे ढवळून निघाला आहे. राजकीय नेत्यांवरील हल्ले, मशिदीवरील प्रकरण, हनुमान चालिसा, त्यामुळे राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे.
Read also:
- राणा दाम्पत्यावर अजित पवारांची स्पष्ट भूमिका; म्हणाले..;
- किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे; देवेंद्र फडणवीस
- नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल! सरकारी वकिलाची माहिती
- राजकारण तापलं! राणा दाम्पत्याला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
- राणा दाम्पत्यानी पोलीस ठाण्यात 101 वेळा केलं हनुमान चालिसाचे पठण! ठाकरे सरकावर केले गंभीर आरोप