मुंबई : शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यात भाजप नेते किरीट सोमय्यांनी गृहसचिव अजयकुमार भल्ला यांची आज दिल्लीत भेट घेतली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून देखील या प्रकरणाबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. किरीट सोमय्यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचं शिवसैनिकांकडून सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खार पोलीस स्टेशन परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तापसण्याचे आदेश दिले आहेत.
राजकारण तापलं! राणा दाम्पत्याला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
किरीट सोमय्या हे आमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना भेटण्यासाठी खार पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. त्यानंतर ते पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच कोणीतरी त्यांच्या गाडीवर दगड फिरकावला. तो दगड त्यांच्या गाडीच्या पुढच्या काचेवर पडला. त्यात किरीट सोमय्यांना दुखापत होऊन त्यांच्या हनुवटीवरून रक्तस्त्राव झाल्याचं दिसत आहे. परंतु किरीट सोमय्यांना झालेली जखम ही कृत्रिम असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
राणा दाम्पत्यानी पोलीस ठाण्यात 101 वेळा केलं हनुमान चालिसाचे पठण! ठाकरे सरकावर केले गंभीर आरोप
या संबंधी दिलीप वळसे पाटील यांनी सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणातून पुढे माहिती समोर येईलच असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला पुढे काय राजकीय घडामोडी घडणार ते आता त्यांच्याकडे लक्ष लागून आहे.
“सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या, कारण लोकशाहीत मतं मांडण्याचा तुमचा अधिकार संपला”
दरम्यान, भाजपच्या शिष्टमंडळासह किरीट सोमय्या दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी आज गृहसचिव अजयकुमार भल्ला यांची भेट घेतली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत त्यांनी अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटायला हवं होतं असंही त्यांनी म्हटल आहे.
Read also:
- “सत्ता गेल्यावर शिवसेनेचं वाटोळं अटळ! ठाकरे सरकारवाल्यांनो आता तरी सुधरा”;
- “मनसुख हिरेन मुख्यमंत्र्यांनी घडवला! तुझाही मनसुख हिरेन करू, अशा मला धमक्या”; किरीट सोमय्या
- राणा दाम्पत्यावर अजित पवारांची स्पष्ट भूमिका; म्हणाले..;
- किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे; देवेंद्र फडणवीस
- नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल! सरकारी वकिलाची माहिती