मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील परिस्थिती विविध घटनांमुळे तणावाची झाली आहे. याच संदर्भात राज्याचे विरोधी पक्षांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना देखील बोलवलं होतं. मात्र विरोधी पक्षांसह राज ठाकरे यांनी देखील या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेद घेत राज्य सरकारव हल्लाबोल चढवला. त्याचबरोबर त्यांनी आपली भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली आहे.
राणा दाम्पत्यावर अजित पवारांची स्पष्ट भूमिका; म्हणाले..;
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. मात्र या गृहमंत्र्यांना काही अधिकार आहेत का? मुंबईत जे काही सध्या सुरू आहेत. ते सर्व मुख्यमंत्र्यांना इशाऱावर सुरू आहे. महाराष्ट्रात या अगोदर अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती. आम्ही मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी पोलखोल यात्रा काढली त्यावर देखील यांनी हल्ला केला. सत्ताधाऱ्यांना वाटतं की आम्ही हल्ले करू म्हणजे पोलखोल कमी होईल, परंतु आम्ही थांबणार नाहीत. आम्ही त्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणारच असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे; देवेंद्र फडणवीस
ठोकशाहीने वागत असेल तर ठोकशाहीनेच उत्तर दिलं जाईल, केरळ बंगालमध्ये खुन झालेत, तरही आम्ही घाबरलो नाहीत. सरकारच्या या दडपशाही, गुंडाशाहीला आम्ही घाबरणारे नाहीत. राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर पाकिस्तानचं युद्ध जिंकल्यासारखं जल्लोष सुरू आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.
नवनीत राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल! सरकारी वकिलाची माहिती
दरम्यान, राज्यात जर हनुमान चालिसा वाचणे जर राजद्रोहाचा गुन्हा असेल तर आम्ही हा गुन्हा रोज करू, हनुमान चालिसा भारतात म्हणायला हवी, मग काय आम्ही पाकिस्तानात हनुमान चालिसा म्हणू का ? नवनीत राणा यांना तुरूंगात हिन दर्जाची वागणूक देण्यात आली आहे. त्यांचा थोडाफार विचार केला पाहिजे. त्यामुळे आम्हाला आता संघर्षाशिवाय पर्याय नाही, असंही ते म्हणालेत.
Read also:
- कोणी स्वस्थपणे भारत पाकिस्तान मॅच पाहू शकतो का? फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
- ” 1980 साली सरकार बरखास्त झाल्यानंतर मी अस्वस्थ झालो नव्हतो, मात्र हल्ली काही लोकं खुप अस्वस्थ”
- किरीट सोमय्यांना झालेली ‘ती’ जखम कृत्रीम? गृहमंत्र्यांनी दिले सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश
- “सत्ता गेल्यावर शिवसेनेचं वाटोळं अटळ! ठाकरे सरकारवाल्यांनो आता तरी सुधरा”;
- “मनसुख हिरेन मुख्यमंत्र्यांनी घडवला! तुझाही मनसुख हिरेन करू, अशा मला धमक्या”; किरीट सोमय्या