मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा नोंद करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषा आणि आक्षेपार्ह वक्तव्या केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर तातडीने सुनावणी करत राणांना सर्वोच्च न्यायालयाने चांगलचं फटकारले.
” 1980 साली सरकार बरखास्त झाल्यानंतर मी अस्वस्थ झालो नव्हतो, मात्र हल्ली काही लोकं खुप अस्वस्थ”
नवनीत राणा यांनी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्यातील जबाबदार पदावर असणाऱ्यांनी विशेषकरून लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदराने बोलावे आणि वागावे असे आम्ही वारंवार सांगत आलो आहे. परंतु त्याकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करतात. लोकप्रतिनिधींकडून या प्रकरणी काही अपेक्षा करणे चुकीचे आहे, असं म्हणत त्यांना न्यायालयाने चांगलचं फटकारलं.
किरीट सोमय्यांना झालेली ‘ती’ जखम कृत्रीम? गृहमंत्र्यांनी दिले सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश
राणा दाम्पत्यांविरोधात कलम 153 अ बरोबरच विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात विशेष सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी सरकारच्या बाजूने युक्तीवाद केला. तर नवनीत राणा यांच्या बाजूने रिजवान मर्चंट यांनी युक्तिवाद केला. यावेळी नवनीत राणा यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
“सत्ता गेल्यावर शिवसेनेचं वाटोळं अटळ! ठाकरे सरकारवाल्यांनो आता तरी सुधरा”;
दरम्यान, ठोकशाहीने वागत असेल तर ठोकशाहीनेच उत्तर दिलं जाईल, केरळ बंगालमध्ये खुन झालेत, तरही आम्ही घाबरलो नाहीत. सरकारच्या या दडपशाही, गुंडाशाहीला आम्ही घाबरणारे नाहीत. राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर पाकिस्तानचं युद्ध जिंकल्यासारखं जल्लोष सुरू आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.
Read also:
- “सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू शकतात”; काॅंग्रेसचा सोमय्यांवर खोचक टोला
- सर्वपक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया ! म्हणाले आम्ही…;
- सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत गृहमंत्र्यांची मोठी खेळी! मशिदीवरील भोंग्याबाबत झाला निर्णय
- “राज्यात हनुमान चालिसा वाचणे, राजद्रोहाचा गुन्हा होत असेल तर आम्ही 100 वेळा गुन्हा करू”
- कोणी स्वस्थपणे भारत पाकिस्तान मॅच पाहू शकतो का? फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला