मुंबई : राज्यातील मशिदीवरील भोंग्याबाबत चर्चेसाठी आज गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. या बैठकीत भोंग्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यात आहे.
“सत्ता गेल्यावर शिवसेनेचं वाटोळं अटळ! ठाकरे सरकारवाल्यांनो आता तरी सुधरा”;
राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलेला 3 तारखेचा अल्टिमेटमवर आम्ही ठाम आहोत. आम्हालाही कायदा सुवस्था उत्तम राखायचा आहे. कुठेही गालबोट लागता कामा नये ही आमची भुमिका आहे. राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली आहे. ती सर्वोच्च न्यायालयाचा दाखला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे इतर धर्मीयांना मिळत आहे, तशी आम्हाला परवानगी द्यावी, असंही ते म्हणाले.
“मनसुख हिरेन मुख्यमंत्र्यांनी घडवला! तुझाही मनसुख हिरेन करू, अशा मला धमक्या”; किरीट सोमय्या
राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला आहे. आता राज्य सराकारने निर्णय घ्यायचा आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकरसंबंधी नियम सांगितलं आहेत. वर्षभर लोकांना परवानगी देणार असं होत नाही. असंही ते म्हणालेत.
राणा दाम्पत्यावर अजित पवारांची स्पष्ट भूमिका; म्हणाले..;
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भोंगे वापरायला परवानगी आहे. रात्री 10 ते सकाळी 6 याच वेळात वापरण्यावर बंदी आहे. मशिदीवरील भोंग्यांचा वापर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्ये निर्णय दिला. त्यानंतर सुद्धा वेळोवेळी अन्य काही न्यायालयाने निर्णय दिले आणि त्याच्या आधारे महाराष्ट्र सरकारने 2015 ते 2017 दरम्यान जीआर काढलेले आहेत. त्याआधारे भोंग्यांचा वापर त्याला परवानगी साठी अटी आणि शर्थी आणि आवाजाची मर्यादा हे सारं स्पष्ट केलं आहे. त्या आधारे आजपर्यंत भोंग्याचा वापर केला जातो.असं दिलीप वळसे पाटील यांनी आज पत्रकार परिषदमध्ये म्हटले आहे.
Read also:
- सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत गृहमंत्र्यांची मोठी खेळी! मशिदीवरील भोंग्याबाबत झाला निर्णय
- “राज्यात हनुमान चालिसा वाचणे, राजद्रोहाचा गुन्हा होत असेल तर आम्ही 100 वेळा गुन्हा करू”
- कोणी स्वस्थपणे भारत पाकिस्तान मॅच पाहू शकतो का? फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
- ” 1980 साली सरकार बरखास्त झाल्यानंतर मी अस्वस्थ झालो नव्हतो, मात्र हल्ली काही लोकं खुप अस्वस्थ”
- किरीट सोमय्यांना झालेली ‘ती’ जखम कृत्रीम? गृहमंत्र्यांनी दिले सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश