मुंबई : राज्यातील मशिदीवरील भोंग्याबाबत चर्चेसाठी आज गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. मात्र या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला. या बैठकीत भोंग्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. मशिदीवरील भोंग्यांबाबत मुद्दा उपस्थित करत त्यांनी गावाकडील किर्तन, गणपती उत्सव, नवरात्री दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमाचा देखील उल्लेख केला. या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंसह अनेक राजकीय नेते उपस्थित होते.
“मनसुख हिरेन मुख्यमंत्र्यांनी घडवला! तुझाही मनसुख हिरेन करू, अशा मला धमक्या”; किरीट सोमय्या
मशिदीवरील भोंग्यांचा वापर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्ये निर्णय दिला. त्यानंतर सुद्धा वेळोवेळी अन्य काही न्यायालयाने निर्णय दिले आणि त्याच्या आधारे महाराष्ट्र सरकारने 2015 ते 2017 दरम्यान जीआर काढलेले आहेत. त्याआधारे भोंग्यांचा वापर त्याला परवानगी साठी अटी आणि शर्थी आणि आवाजाची मर्यादा हे सारं स्पष्ट केलं आहे. त्या आधारे आजपर्यंत भोंग्याचा वापर केला जातो. असंही ते म्हणाले.
राणा दाम्पत्यावर अजित पवारांची स्पष्ट भूमिका; म्हणाले..;
केंद्र सरकारने जे नियम घाऊन दिले आहेत त्यानुसार जर भूमिका घेतल्यास वेगवेगळ्या राज्यांमधील वेगवेगळी भूमिका संपुष्टात येईल, त्यामुळे ज्या शासन आदेशानुसार भोंगे वापरले जातात हे कायम राहणार आहे. अशातच गावाखेड्यांमधील किर्तन, काकड आरत्या, आणि भजनांसंदर्भातील मुद्दाही उपस्थित झाल्यासं त्यांनी सांगितलं आहे. तसेच ज्यांनी भोंगे लावले, जे वापर करतायत त्यांनीन त्या ठिकाणी त्याची काळजी तर अन्य समाजावर अथवा धार्मिक उत्सवांवर त्याचा परिणाम होणार नाही. असंही ते म्हणालेत.
किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे; देवेंद्र फडणवीस
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे 3 तारखेपर्यंत अल्टमिटेम दिला होता. त्यानंतर मोठ्या आवाजात त्या पुढे हनुमान चालिसा लावण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे. अशातच आता गृहमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे मशिदीवरील भोंगे उतरतील की नाही, हा प्रश्न अजूनही अंधारात आहे.
Read also:
- “राज्यात हनुमान चालिसा वाचणे, राजद्रोहाचा गुन्हा होत असेल तर आम्ही 100 वेळा गुन्हा करू”
- कोणी स्वस्थपणे भारत पाकिस्तान मॅच पाहू शकतो का? फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
- ” 1980 साली सरकार बरखास्त झाल्यानंतर मी अस्वस्थ झालो नव्हतो, मात्र हल्ली काही लोकं खुप अस्वस्थ”
- किरीट सोमय्यांना झालेली ‘ती’ जखम कृत्रीम? गृहमंत्र्यांनी दिले सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश
- “सत्ता गेल्यावर शिवसेनेचं वाटोळं अटळ! ठाकरे सरकारवाल्यांनो आता तरी सुधरा”;