मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर काल शिवसैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात किरीट सोमय्यांच्या हनवुटीला जखम झाल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. तर ही जखम कृत्रीम असल्याचं शिवसैनिकांनी म्हटलं आहे. यासंबंधी गृहमंत्र्यांनी देखील सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले आहेत. याचाच धागा पकडत काॅंग्रेसने किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
किरीट सोमय्यांना झालेली ‘ती’ जखम कृत्रीम? गृहमंत्र्यांनी दिले सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश
किरीट सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू इच्छित आहेत. डॉक्टरांनुसार 0.5 cm x 0.1 cm x 0.1 cm चा ठिपका चेहेऱ्यावर आला. तो आणला गेला का? हे चौकशीअंती स्पष्ट होईलच, परंतु २ दिवसांत बँडेज गायब झाले तसा आता तो दिसेनासाही झाला. या नौटंकीने महाराष्ट्राचे राजकारण गढूळ होत आहे. असा खोचक टोला काॅंग्रेसनेते सचिन सावंत यांनी लगावला आहे.
“सत्ता गेल्यावर शिवसेनेचं वाटोळं अटळ! ठाकरे सरकारवाल्यांनो आता तरी सुधरा”;
तसेच आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याआधी त्यांना वांद्रे येथील पोलिसांनी अटक करून त्यांना तुरूंगात टाकलं होतं. त्यावेळी त्यांनी तुरूंगात आम्ही 101 वेळा हनुमान चालिसाचं पठण केल्याचं म्हटलं. त्यावर बोलताना म्हणाले की, जेलमध्ये खऱ्या अर्थाने हनुमान चालीसा वाचण्याची गरज आहे. संकटमोचन स्तोत्र हे संकटात वाचतात. हनुमंताच्या कृपेने लवकर जामिनावर सुटका होऊ शकेल. असं त्यांनी ट्विट केलं आहे.
“मनसुख हिरेन मुख्यमंत्र्यांनी घडवला! तुझाही मनसुख हिरेन करू, अशा मला धमक्या”; किरीट सोमय्या
दरम्यान, मातोश्रीवर हनुमान चालिसाचं पठण करण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा मुंबईत दाखल झाले होते. पंरतु त्यांना शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊ दिलं नाही. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात गेले असता त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यात त्यांना जखम झाल्याची माहिती समोर आली आहे.
Read also:
- सर्वपक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया ! म्हणाले आम्ही…;
- सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत गृहमंत्र्यांची मोठी खेळी! मशिदीवरील भोंग्याबाबत झाला निर्णय
- “राज्यात हनुमान चालिसा वाचणे, राजद्रोहाचा गुन्हा होत असेल तर आम्ही 100 वेळा गुन्हा करू”
- कोणी स्वस्थपणे भारत पाकिस्तान मॅच पाहू शकतो का? फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
- ” 1980 साली सरकार बरखास्त झाल्यानंतर मी अस्वस्थ झालो नव्हतो, मात्र हल्ली काही लोकं खुप अस्वस्थ”