मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर मुख्यमंत्र्याबाबत अपशब्द वापरल्या प्रकरणी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल कऱण्यात आला. त्याआधी भाजपचे मोहित कंबोज आणि किरीट सोमय्यांवर शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. यावरून आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
कोणी स्वस्थपणे भारत पाकिस्तान मॅच पाहू शकतो का? फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
किरीट सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणावर बोलताना ठोकशाहीनं जर सरकार वागत असेल तर ठोकशाहीनं उत्तर दिलं आहे. त्यावर महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय सूड नाट्य पाहता. महाराष्ट्रातील जनतेसाठी राजकारण हा आजार असेल तर त्याचं मूळ मातोश्री आहे आणि औषध देवेंद्र फडणवीस सरकार आहे. असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.
” 1980 साली सरकार बरखास्त झाल्यानंतर मी अस्वस्थ झालो नव्हतो, मात्र हल्ली काही लोकं खुप अस्वस्थ”
ठोकशाहीने वागत असेल तर ठोकशाहीनेच उत्तर दिलं जाईल, केरळ बंगालमध्ये खुन झालेत, तरही आम्ही घाबरलो नाहीत. सरकारच्या या दडपशाही, गुंडाशाहीला आम्ही घाबरणारे नाहीत. राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर पाकिस्तानचं युद्ध जिंकल्यासारखं जल्लोष सुरू आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.
किरीट सोमय्यांना झालेली ‘ती’ जखम कृत्रीम? गृहमंत्र्यांनी दिले सीसीटिव्ही फुटेज तपासण्याचे आदेश
दरम्यान, राणा दाम्पत्यांविरोधात कलम 153 अ बरोबरच विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयात विशेष सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी सरकारच्या बाजूने युक्तीवाद केला. तर नवनीत राणा यांच्या बाजूने रिजवान मर्चंट यांनी युक्तिवाद केला. यावेळी नवनीत राणा यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Read also:
- उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांना चांगलचं फटकारलं! न्यायालयाने याचिकाही फेटाळली
- “सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू शकतात”; काॅंग्रेसचा सोमय्यांवर खोचक टोला
- सर्वपक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया ! म्हणाले आम्ही…;
- सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत गृहमंत्र्यांची मोठी खेळी! मशिदीवरील भोंग्याबाबत झाला निर्णय
- “राज्यात हनुमान चालिसा वाचणे, राजद्रोहाचा गुन्हा होत असेल तर आम्ही 100 वेळा गुन्हा करू”