औरंगाबाद : गुढीपाडव्याच्या सभेनंतर ठाण्यातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जोरदार सभा गाजली. या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्यांसह हिदुत्वाचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यातील राजकारण चांगलचं ढवळून निघालं होतं. आता त्यांची 1 मे रोजी औरंगाबाद याठिकाणी सभा होत आहे. त्या सभेच्या निमंत्रण प्रत्रिकेचे प्रकाशन करण्यात आलं आहे.
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत गृहमंत्र्यांची मोठी खेळी! मशिदीवरील भोंग्याबाबत झाला निर्णय
शिवतीर्थावर मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्याहस्ते या भव्य ऐतिहासिक सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे नेते बाळासाहेब नांदगावकर, नितीन सरदेसाई दिलीप धोत्रे, शिरीष सावंत अविनाश अभंयकर, संदीप देशपांडे हे उपस्थित होते. त्यामुळे औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या मैदानावरील सभेकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.
“राज्यात हनुमान चालिसा वाचणे, राजद्रोहाचा गुन्हा होत असेल तर आम्ही 100 वेळा गुन्हा करू”
मशिदीवरील भोंग्याबाबत येत्या 3 मे पर्यंत अल्टिमेटम राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या सभेत मशिदीवरील भोंगा, राज्य सरकारची भूमिका आणि हिंदुत्तवाबाबत भाषण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या या सभेकडे महाराष्ट्रातील सगळ्या लोकांचं लक्ष लागून आहे.
कोणी स्वस्थपणे भारत पाकिस्तान मॅच पाहू शकतो का? फडणवीसांचा शरद पवारांना खोचक टोला
दरम्यान, औरंगाबाद येथील सभेला राष्ट्रवादी काॅंग्रेस, प्रहार संघटनेसह अन्य 6 संघटनांनी विरोध दर्शविला आहे. तसेच त्या सभेला जिल्हाधिकारांनी देखील विरोध दर्शविला होता. तसेच राज ठाकरे यांच्या भुमिकेवरून सध्या जोरदार त्यांच्यावर टिका केली जात आहे. त्यामुळे राज ठाकरे याबाबत काय भाष्य करणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “हनुमान चालीसातील बर्याच ओळी चुकल्या देवेंद्रजी! राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात या एकदा”
- “राजकारण हा आजार असेल, तर त्याचं मुळ कारण मातोश्री, अन् त्यावर फडणवीस सरकार औषध”
- उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांना चांगलचं फटकारलं! न्यायालयाने याचिकाही फेटाळली
- “सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू शकतात”; काॅंग्रेसचा सोमय्यांवर खोचक टोला
- सर्वपक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया ! म्हणाले आम्ही…;