मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर अलिकडेच शिवसैनिकांनी हल्ला केला. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
सर्वपक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया ! म्हणाले आम्ही…;
विरोधकांवर हल्ले झाले म्हणजे काय झालं आहे ? कोणी एखादा माथेफिरू ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या भाजपचं नेतृत्व करतात त्या पक्षाच्या नेते लोकशाहीबद्दल प्रवचन देत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. सत्तेत येण्याची प्रबळ इच्छा होती. आणि उबळही होती. मात्र तरीही सत्तेत न आल्याने जी अस्वस्थता आहे. त्यातून अशा प्रकारची वक्तव्य होत आहे.
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत गृहमंत्र्यांची मोठी खेळी! मशिदीवरील भोंग्याबाबत झाला निर्णय
ते पुढे बोलताना म्हणाले की, राज्यात जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ओळखतात त्यांना कळेल की महाराष्ट्रसारखं लोकशाहीवादी सरकार देशात नसेल. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या तीन महिन्यांत 17 खून आणि बलात्कार झाले आहेत. आसाम सरकारने गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक केली. कारण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्वीट केलं होतं. मेवाणी यांना जामीन देण्यात आल्यानंतर पुन्हा अटक करण्यात आली हे कोणतं लक्षण आहे. अंसही ते म्हणाले.
“राज्यात हनुमान चालिसा वाचणे, राजद्रोहाचा गुन्हा होत असेल तर आम्ही 100 वेळा गुन्हा करू”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घटनांनी महाराष्ट्र ढवळून निघालं आहे. भाजप नेत्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता संजय राऊतांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- औरंगाबादमध्ये राज ठाकरे जोरदार गरजणार! राज ठाकरेंकडून निमंत्रण प्रत्रिकेचे प्रकाशन
- “हनुमान चालीसातील बर्याच ओळी चुकल्या देवेंद्रजी! राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात या एकदा”
- “राजकारण हा आजार असेल, तर त्याचं मुळ कारण मातोश्री, अन् त्यावर फडणवीस सरकार औषध”
- उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांना चांगलचं फटकारलं! न्यायालयाने याचिकाही फेटाळली
- “सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू शकतात”; काॅंग्रेसचा सोमय्यांवर खोचक टोला