मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांना न्यायालायने पुन्हा एकदा दणका दिला आहे. राणा दाम्पत्यानी मुंबई सेशन्स न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता, परंतु तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे त्यांचा तुरूंगातमधील मुक्काम आता आणखी तीन दिवस वाढला आहे. यावर आता पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार आहे.
“राजकारण हा आजार असेल, तर त्याचं मुळ कारण मातोश्री, अन् त्यावर फडणवीस सरकार औषध”
राणा दाम्पत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानात हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली. त्यानंतर राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अनेक नाट्यामय घडामोडीनंतर राणा दाम्पत्याना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी राणा दाम्पत्याने शिवडी येथील विशेष कोर्टोत जामीन अर्ज केला. हा अर्ज प्रलंबित असताना त्यावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांना चांगलचं फटकारलं! न्यायालयाने याचिकाही फेटाळली
पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 153 अ अंतर्गत समुदायांत तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली राणा दाम्पत्यावर एफआयआर दाखल केली. तसंच कायदा- सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केल्याच्या आरोपाखील त्यांना बाॅम्बे पोलीस कायद्याखालील कमलेही लावली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत सध्या वाढ झाली आहे.
“सोमय्या नख कापून परमवीर चक्राचे दावेदार बनू शकतात”; काॅंग्रेसचा सोमय्यांवर खोचक टोला
दरम्यान, नवनीत राणा यांनी तुरूंगात मिळत असलेल्या हिन दर्जाच्या वागणूकी संदर्भात लोकसभा अध्यक्ष यांना पत्र लिहिले आहे. त्यावर यांसदर्भात राज्य सरकारला विचारणा केली असता गृहमंत्र्यांनी चौकशी करून उत्तर दिलं जाईल, असं म्हटलं आहे.
Read also:
- “ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झालीय, आगडोंब उसळलाय, जळजळतंय त्यांनी..;” मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष टोला
- नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? आजीबाईंच्या भेटीवरून निलेश राणेंचा सवाल
- “सत्तेत येण्याची प्रबळ इच्छा अन् उबळही, मात्र जी अस्वस्थता..;”राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
- औरंगाबादमध्ये राज ठाकरे जोरदार गरजणार! राज ठाकरेंकडून निमंत्रण प्रत्रिकेचे प्रकाशन
- “हनुमान चालीसातील बर्याच ओळी चुकल्या देवेंद्रजी! राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात या एकदा”