औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या मैदानावर सभा होत आहे. परंतु त्या सभेआधी 10 मे पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले असल्याच्या बातम्या समाज माध्यमांवर फिरत होत्या. त्यावरून आम्ही सभेसाठी ठाम आहोत. सभा ही होणारच असं वक्तव्य मनसेकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर या बातमीला पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दुजोरा दिला आहे.
“हनुमान चालीसातील बर्याच ओळी चुकल्या देवेंद्रजी! राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात या एकदा”
निखील गुप्ता म्हणाले की, जी सध्या जमावबंदीची बातमी समाज माध्यमांवर फिरत आहे. ती माहिती चुकीची आहे. कलम 144 संबंधी कोणताहीी आदेश काढण्यात आलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी, नागरिकांच्या हालचाली, काठ्या, शस्त्र बाळगणं यावर आम्ही लक्ष ठेवून असतो. ही एक सामान्य प्रक्रिया असून ती वर्षभर असे आदेश काढले जातात. असं ते म्हणाले.
“राजकारण हा आजार असेल, तर त्याचं मुळ कारण मातोश्री, अन् त्यावर फडणवीस सरकार औषध”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होत असून त्या सभेच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचा आदेश काढल्याचा गैरसमज झाल्यासंबंधी त्यांना विचारले असता. ते म्हणाले की, असं काही नाही. समाजात वावरताना दैनंदिन घडामोडी घटना घडत असतात. ज्यामध्ये धऱणं आंदोलन, मोर्चा यांचा सामान्यपणे 15 दिवसांनी आढावा घेतला जात असतो. हा आता काढलेला आदेश नाही. हे वर्षभर सुरू असतं. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या सभेबाबत निर्णय झालेला नाही. असंही ते म्हणाले.
उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्यांना चांगलचं फटकारलं! न्यायालयाने याचिकाही फेटाळली
दरम्यान, शिवतीर्थावर मनसे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यावेळी त्यांच्याहस्ते या भव्य ऐतिहासिक सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मनसे नेते बाळासाहेब नांदगावकर, नितीन सरदेसाई दिलीप धोत्रे, शिरीष सावंत अविनाश अभंयकर, संदीप देशपांडे हे उपस्थित होते. त्यामुळे औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ या मैदानावरील सभेकडे सगळ्याचं लक्ष लागून आहे.
Read also:
- राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ! कोठडीतील मुक्काम वाढला
- “ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झालीय, आगडोंब उसळलाय, जळजळतंय त्यांनी..;” मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष टोला
- नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? आजीबाईंच्या भेटीवरून निलेश राणेंचा सवाल
- “सत्तेत येण्याची प्रबळ इच्छा अन् उबळही, मात्र जी अस्वस्थता..;”राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
- औरंगाबादमध्ये राज ठाकरे जोरदार गरजणार! राज ठाकरेंकडून निमंत्रण प्रत्रिकेचे प्रकाशन