मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलिकडेच राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राज्यात मनसे विरूद्ध राष्ट्रवादी काॅंग्रेस असा राजकीय संघर्ष पेटला होता. यात आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी उडी घेतली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
औरंगाबादमध्ये राज ठाकरे जोरदार गरजणार! राज ठाकरेंकडून निमंत्रण प्रत्रिकेचे प्रकाशन
ते म्हणाले की, या राज्यात शरद पवारांनी खऱ्या अर्थाने जातीयवादाला खतपाणी घातलं आहे. म्हणून त्यांनी प्रत्येक जातीचा एक नेता पक्षात ठेवला आहे. या नेत्याने आपली जात सांभाळायची कितीही भ्रष्टाचार करा, आम्ही तुम्हाला मंत्री करतो फक्त तुम्ही तुमची जात संभाळा. शरद पवार कसे आपले तारणहार आहेत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा हा धंदा महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे. महाराष्ट्राला आता हे समजलं आहे. असंही ते म्हणाले.
“हनुमान चालीसातील बर्याच ओळी चुकल्या देवेंद्रजी! राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात या एकदा”
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी विकास कामावर बोलायला तयार नाही. पोलिसांच्या बाळाचा वापर करून दहशत दाखवत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना चिरडत आहेत. परंतु एक शकुनीमामा संतरंजीवरती चाल खेळून दुसरीकडे लक्ष केंद्रीत करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. ज्या बाजूला शकुनीमामाचा सुळसुळाट असतो त्यांची सेना कौरवांची सेना असते आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात पांडवांची सेना जिंकणार आणि कौरवांचा पाडवा थोड्या दिवसात झालेला महाराष्ट्रात दिसेल, असंही ते म्हणालेत.
“राजकारण हा आजार असेल, तर त्याचं मुळ कारण मातोश्री, अन् त्यावर फडणवीस सरकार औषध”
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस सवांद यात्रेत विरोधी पक्षांवर सडकून टिका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षांनी देखील सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे राज्यातील सध्या राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे.
Read also:
- “औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेदरम्यान जमावबंदीचे आदेश नाहीत”; आयुक्तांनी केलं स्पष्ट
- राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ! कोठडीतील मुक्काम वाढला
- “ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झालीय, आगडोंब उसळलाय, जळजळतंय त्यांनी..;” मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष टोला
- नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? आजीबाईंच्या भेटीवरून निलेश राणेंचा सवाल
- “सत्तेत येण्याची प्रबळ इच्छा अन् उबळही, मात्र जी अस्वस्थता..;”राऊतांचा फडणवीसांवर घणाघात