मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयातून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणासंबंधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चांदिवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. या अहवालात मुंबईचे तात्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याची प्राथमिक समजत आहे.
“ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झालीय, आगडोंब उसळलाय, जळजळतंय त्यांनी..;” मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष टोला
पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सरकार विरोधात लेटरबॉम्ब टाकला होता. त्यात अनिल देशमुख हे मुंबईतील पोलिसांना दिवसाला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगत असे. मुंबईतील 1750 बार आणि रेस्टॉरंटमधून वसुली करण्याचे टार्गेट देत होते. या प्रकरणाबाबत राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती के. यु. चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना केली. त्यानंतर हा अहवाल आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुपुर्द करण्यात आला आहे.
नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? आजीबाईंच्या भेटीवरून निलेश राणेंचा सवाल
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पद सोडावं लागलं. त्यानंतर त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. या प्रकरणात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसल्या. विरोधकांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची बाजू लावून धरल्याने देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तर यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.
“सत्तेत येण्याची प्रबळ इच्छा अन् उबळही, मात्र जी अस्वस्थता..;”राऊतांचा फडणवीसांवर घणाघात
दरम्यान, राज्यात गेल्या दोन दिवसापासून राजकीय नाट्य सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा यांनी तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचा आरोप मुंबई पोलिसांवर केला. मात्र मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हा आरोप खोडून काढला. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केला. त्यात नवनीत राणा पोलीस ठाण्यात चहा पितांना दिसत आहेत. नवनीत राणा सध्या मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत आहेत.
Read also:
- “शकुनीमामाच्या कौरव सेनांवर फडणवीसांच्या नेतृत्वात पांडवांची सेना जिंकणार”; सदाभाऊंचा शरद पवारांवर खोचक टोला
- नवनीत राणांच्या आरोपांवर पोलिसांनी केला पुराव्यांसह व्हिडीओ पोस्ट! राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
- “शरद पवारांनी जातीयवादाला खतपाणी घातलं, म्हणून प्रत्येक जातीचा एक नेता पक्षात ठेवला”
- “औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेदरम्यान जमावबंदीचे आदेश नाहीत”; आयुक्तांनी केलं स्पष्ट
- राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ! कोठडीतील मुक्काम वाढला