मुंबई : शरद पवारांनी जातीयपणाला खतपाणी घातले असा आरोप आतापर्यंत कुणीही केला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सांगितले आहे की शरद पवार यांच्या हाताला धरून मी राजकारण शिकलो आहे. त्यामुळे त्यांच्यावर आरोप करण्यात काहीच गैर नाही असं अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. अलिकडे शरद पवारांवर जातीय वादाचे आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहेत. यावर छगन भुजबळांनी सनसनीत उत्तर दिले आहे.
राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ! कोठडीतील मुक्काम वाढला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील गुढीपाडवाच्या सभेत शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यात यावरून जोरदार संघर्ष झाला. यामध्ये आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी देखील उडी घेतलीय.
“ज्यांच्या पोटात अॅसिडीटी झालीय, आगडोंब उसळलाय, जळजळतंय त्यांनी..;” मुख्यमंत्र्यांचा अप्रत्यक्ष टोला
राज्यात शरद पवारांनी खऱ्या अर्थाने जातीयवादाला खतपाणी घातलं आहे. म्हणून त्यांनी प्रत्येक जातीचा एक नेता पक्षात ठेवला आहे. या नेत्याने आपली जात सांभाळायची कितीही भ्रष्टाचार करा, आम्ही तुम्हाला मंत्री करतो फक्त तुम्ही तुमची जात संभाळा. शरद पवार कसे आपले तारणहार आहेत हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवा हा धंदा महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षापासून सुरू आहे. महाराष्ट्राला आता हे समजलं आहे. असं सदाभाऊ खोत म्हणाले.
नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? आजीबाईंच्या भेटीवरून निलेश राणेंचा सवाल
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस सवांद यात्रेत विरोधी पक्षांवर सडकून टिका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षांनी देखील सत्ताधारी पक्षांवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे राज्यातील सध्या राजकीय वातावरण चांगलाचं तापलं आहे.
Read also:
- देशमुखांना दिलासा मिळण्याची शक्यता! गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला चांदिवाल आयोगाचा अहवाल
- “शकुनीमामाच्या कौरव सेनांवर फडणवीसांच्या नेतृत्वात पांडवांची सेना जिंकणार”; सदाभाऊंचा शरद पवारांवर खोचक टोला
- नवनीत राणांच्या आरोपांवर पोलिसांनी केला पुराव्यांसह व्हिडीओ पोस्ट! राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
- “शरद पवारांनी जातीयवादाला खतपाणी घातलं, म्हणून प्रत्येक जातीचा एक नेता पक्षात ठेवला”
- “औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेदरम्यान जमावबंदीचे आदेश नाहीत”; आयुक्तांनी केलं स्पष्ट