मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी, भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालून सभागृह दणाणून सोडले, तसेच चर्चेत राहिले, ते तालिका अध्यक्ष भास्कर जाधव. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी, सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. तसेच, तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन आणि सभागृहाची शिस्त आणि नियम मोडण्यात आले. या घटनेनंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधवांनी, भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि भाजपच्या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन करण्यात आलं.
“मी ईडीला भीक घालत नाही”, भास्कर जाधवांनी फोडली डरकाळी
यानंतर दुसऱ्या दिवशी, या कारवाईचा निषेध म्हणून, संतापलेल्या भाजप आमदारांनी विधानसभेच्या आवारातच प्रतिविधानसभा भरवली. यावरही तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधवांनी आक्रमक भूमिका घेत, ही प्रतिविधानसभा उधळून लावण्याचे आदेश दिले. या सगळ्या घटनांमुळे, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांचं नाव चांगलंच चर्चेत राहिलं.
सुप्रिया सुळेंनी उचलली स्वप्निलच्या बहिणीच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी!
त्यातच आता, महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमतानं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच सेनेने स्वीकारावं, असं भास्कर जाधव म्हणालेत. तसेच तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी व्हायला तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असंही त्यांनी सांगितलंय. भास्कर जाधव गुहागरमध्ये बोलत होते. शिवसेनेकडे आधीच कोणतीही महत्त्वाची खाती नाहीत आणि त्यात आहे हे मंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये, असे स्पष्ट मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.
“केंद्राचे तिन्ही कृषी कायदे, ठाकरे सरकारने जसेच्या तसे लागू करावेत”
दरम्यान, यावरून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी, भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला असून, शिवसेनेला वनखात्याची गरज नाही, कारण शिवसेनेत आता वाघच शिल्लक नाहीत!” असा घणाघात केला आहे. दुसरीकडे, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली, आज भाजपकडून १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईच्या निषेधार्थ, शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून भाजप आक्रमक झाल्याचे दिसत आहे.
Read Also :
- “नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू”, चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली
- पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते सेनाभवनावर धडकणार? असंख्य शिवसैनिकांचा कडेकोट बंदोबस्त
- बीडमध्ये भाजपला धक्का; प्रीतम मुंडेला डावलल्यामुळे तब्बल १४ जणांनी दिला राजीनामा
- “‘बारामतीत कॉंग्रेसला मानणारा वर्ग, वेगळे प्लॅनिंग करावे लागेल; पुढे जायचे असेल तर शत्रुला…”
- उदय सामंत म्हणाले, “संजय राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार”