बीड : केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. बीडमध्ये राजीनामासत्र सुरू झाले आहे. आज जिल्ह्यात १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. त्यामुळे भाजपमधील संघर्ष आणखी चिघळला आहे.
जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिलेल्या, बँकेला ईडीने बजावली नोटीस
‘टीम नरेंद्र, टीम देवेंद्र असं काही पक्ष मानत नाही, आम्हाला राष्ट्र प्रथम आहे’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर बीडमध्ये भाजपमध्ये मोठे राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना भाजपकडून मंत्रिपदापासून डावलल्यानंतर जिल्ह्यात राजीनामासत्र सुरू झाले आहे. शुक्रवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
केंद्र सरकारकडून होणारी साखर उद्योगाची कोंडी अन् आर्थिक संकटात सापडलेले साखर कारखाने
आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. यासह जिल्ह्यातील भाजपच्या विविध १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. दरम्यान, प्रीतम मुंडे यांचा मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने , बीड जिल्ह्यातील भाजप गटात मोठी नाराजी आणि अस्वस्थता पसरली आहे. दोन दिवसात तब्बल १४ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याने, आता आणखीन किती राजीनामे येणार ? आणि आता पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेणार ? याकडे राजकीय वर्तुळातून लक्ष लागले आहे.
Read Also :
- “‘बारामतीत कॉंग्रेसला मानणारा वर्ग, वेगळे प्लॅनिंग करावे लागेल; पुढे जायचे असेल तर शत्रुला…”
- सुप्रिया सुळेंनी उचलली स्वप्निलच्या बहिणीच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी!
- भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले; आंदोलनातच घडला प्रकार!
- जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिलेल्या, बँकेला ईडीने बजावली नोटीस
- नितीन गडकरींच्या खासदारकीवर, नाना पटोलेंचा आक्षेप; दाखल केलेल्या याचिकेवर ६ ऑगस्टपासून सुनावणी