मुंबई : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा निवडून आलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा, पहिला विस्तार झाला. त्याची चर्चा अजूनही देशात सुरु आहे. यामध्ये ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांचा समावेश केला गेला असून, काहींना बढती मिळाली आहे, तर जुन्या १२ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला गेला आहे.
“मी ईडीला भीक घालत नाही”, भास्कर जाधवांनी फोडली डरकाळी
या पार्श्वभूमीवर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, प्रसार माध्यमांशी बोलताना, केंद्रात खातेबदल झाले, नवीन मंत्री झाले, पण डबे कितीही बदललेले, तरी काही उपयोग नाही, इंजिन बदलणे गरजेच आहे, ते सध्या देशाच्या जास्त हिताचं आहे,” असा हल्लाबोल मोदी सरकारवर केला आहे.
सुप्रिया सुळेंनी उचलली स्वप्निलच्या बहिणीच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी!
त्यावर आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं असून, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना, “नाना पटोले हे पप्पू आहेत. केंद्रात एक पप्पू आहे, तसाच राज्यात देखील एक पप्पू आहे. त्यांच्या तोंडाला येईल ते बोलत असतात”, असा हल्लबोल त्यांनी केला आहे. त्यामुळे, आता यावर नाना पटोले काय उत्तर देतात हे पाहणं, महत्वाचं आहे.
Read Also :
- पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते सेनाभवनावर धडकणार? असंख्य शिवसैनिकांचा कडेकोट बंदोबस्त
- बीडमध्ये भाजपला धक्का; प्रीतम मुंडेला डावलल्यामुळे तब्बल १४ जणांनी दिला राजीनामा
- “‘बारामतीत कॉंग्रेसला मानणारा वर्ग, वेगळे प्लॅनिंग करावे लागेल; पुढे जायचे असेल तर शत्रुला…”
- उदय सामंत म्हणाले, “संजय राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार”
- “केंद्राचे तिन्ही कृषी कायदे, ठाकरे सरकारने जसेच्या तसे लागू करावेत”