धाराशिव : महायुतीकडून धाराशिव लोकसभेची जागा ही अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये सध्या राजकीय हालचाली वेगाने वाढल्या आहेत. तुळजापुरचे भाजप आमदार राणा जगजितसिंंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अर्चना पाटील यांना अजित पवार गटाकडून धाराशिव लोकसभेतून उमेदवारी मिळणार अशीही माहिती सुत्रांनी दिलीय. त्यामुळे याठिकाणी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर विरूद्ध अर्चना पाटील असा सामना पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा…“20 वर्षांपासून आबंडेकरांचा पराभव, यंदीही निवडणुकीच्या रिंगणात,”अकोल्यात पुन्हा तिरंगी लढत अटळ
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी राजकीय उलथाफालत होऊ लागल्या आहेत. अशातच आता ठाकरे गटातील विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना टक्कर देण्यासाठी महायुतीकडून नवी चाल खेळली जात आहेत. अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर निंबाळकरांच्या विरोधात उतरवणार असल्याची माहिती समोर आलीय.
दुसऱ्या बाजूला ओमराजे निंबाळकर यांनी एकला रे चलो रे प्रमाणे मतदारसंघ पिंजून काढत असले तीर महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धाराशिवच्या उमेदवारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील भाजप, शिवसेना शिंदेगट आणि अजित पवार गट नेत्यांनी एकत्र बसून कोणाला उमेदवारी द्यायची याबबात एकमुखी निर्णय घ्यावा. त्यावर तिन्ही पक्षाचे नेते उत्तर देतील असे उत्तर दिले.
हेही वाचा…“दिलेली उमेदवीरीही कापतात अन् सेनापती म्हणून बसवलेले बोलके बाहुले सगळं गुपगुमान ऐकतात”, शिंदेंना डिवचलं
दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीकडून माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार इच्छुक असले तरी बिराजदार हे प्रभावी उमेदवार ठरू शकत नाहीत, म्हणून त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील आमदार विक्रम काळे यांचे नाव आघाडीवर होते, पण आणखी चार वर्षे कालावधी बाकी असल्याने काळे यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यानंतर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा आणि ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा आग्रह अजित पवार यांनी धरला पण राणा पाटील यांनी आपले भाजपमध्ये व्यवस्थित बस्तान बसल्याचे सांगून नकार दिला. यातून मार्ग काढण्यासाठी राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन महायुतीची उमेदवारी देण्याची कल्पना समोर आली.
READ ALSO :
हेही वाचा…“अमोल कोल्हेंना भावनिक राजकारण का करावं लागतंय ?”, आढळराव पाटलांनी कोल्हेंची केली पोलखोल
हेही वाचा…“दिल्ली बहुत दूर हैं बच्चू…! श्रीकांत शिंदे यंदा दिल्लीत पोहोचणार नाहीत”
हेही वाचा…“ठाकरेंवर दबाव टाकण्याची कोणाची हिमंत झाली नाही, आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो..!” दानवेंनी डिवचलं
हेही वाचा..‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,”आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं आवाहन
हेही वाचा…“घड्याळ तात्पुरतं, अन् वेळ वाईट”, कोर्टाने फटकारलं, शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं