पुणे : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर यंदाच्या निवडणुकांकडे विशेष लक्ष लागून राहिलं आहे. यातच बारामतीप्रमाणेच शिरूर लोकसभा मतदारसंघात देखील पवार विरूद्ध पवार अशी लढत बघायला मिळणार आहे. शिवसेनेकडून राष्ट्रवादीत आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवार गटातील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पुन्हा संधी देण्यात आलीय. त्यामुळे शिरूरचं मैदान मारण्यासाठी आता दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरूवात केलीय.
हेही वाचा…“दिलेली उमेदवीरीही कापतात अन् सेनापती म्हणून बसवलेले बोलके बाहुले सगळं गुपगुमान ऐकतात”, शिंदेंना डिवचलं
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील पायाला भिंगरी लावून प्रचार करतांना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला कोल्हेंकडून प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. अशातच शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे एकदा निवडून गेल्यानंतर पुन्हा मतदारसंघात फिरकलेच नसल्यामुळे नागरिक नाराज आहेत. याचमुळे अमोल कोल्हे भावनिक राजकारण करत असल्याचे चित्र आहे. यावर कोल्हेंचे विरोधी उमेदवार आढळराव पाटलांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मै मैरी झांशी नही दुंगी”, तिकीट कापलं, भावना गवळी आक्रमक, आज उमेदवारी अर्ज भरणार ?
अमोल कोल्हेंना सध्या भावनिक राजकारण का करावं लागतंय? असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले की, “कोल्हेंनी विकासकामं केली नाहीत. त्यांना विजयाची खात्री नाही. यापूर्वी कोल्हे जेव्हा उमेदवार म्हणून शिरूरमध्ये यायचे, तेव्हा लोक सन्मामाने डोक्यावर पदर घेऊन रांगा लावायचे. कारण संभाजी महाराज म्हणून लोकांमध्ये त्यांची प्रतिमा होती. मात्र आता त्यांना घरोघरी जाऊन ४-५ लोकांसमोर भाषण द्यावे लागत आहे. काल मी पाहिलं, आमचा ग्रामीण दौरा होता. एका घरामध्ये हॉलमध्ये फक्त ७-८ लोक होते, त्यांच्यापुढे त्यांनी अर्धा तास भाषण दिलं. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना भावनिक राजकारण करणं साहजिक आहे”, असेही आढळराव पाटलांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…“दिल्ली बहुत दूर हैं बच्चू…! श्रीकांत शिंदे यंदा दिल्लीत पोहोचणार नाहीत”
हेही वाचा…“ठाकरेंवर दबाव टाकण्याची कोणाची हिमंत झाली नाही, आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो..!” दानवेंनी डिवचलं
हेही वाचा..‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,”आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं आवाहन
हेही वाचा…“घड्याळ तात्पुरतं, अन् वेळ वाईट”, कोर्टाने फटकारलं, शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं
हेही वाचा…“20 वर्षांपासून आबंडेकरांचा पराभव, यंदीही निवडणुकीच्या रिंगणात,”अकोल्यात पुन्हा तिरंगी लढत अटळ