मुंबई : महायुतीत सध्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीय. हिंगोली लोकसभेत जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची वेळ शिंदेंवर आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच पुत्र असलेल्या कल्याण लोकसभेची उमेदवारी अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीय. तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका केलीय.
हेही वाचा…“मै मैरी झांशी नही दुंगी”, तिकीट कापलं, भावना गवळी आक्रमक, आज उमेदवारी अर्ज भरणार ?
एका बाजूला महायुतीत कल्याण लोकसभेबाबत भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच बघायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला ठाकरेंनी वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर झालीय. यातच कोणत्याही परिस्थिती कल्याण लोकसभा जिंकणारच असा दावा श्रीकांत शिंदेंनी केलाय. त्यावर “आता तुम्ही महायुतीत आहात, तर अजून स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकलेला नाहीत आणि जिंकण्याची भाषा करत आहात. दिल्ली बहुत दूर हैं बच्चू. श्रीकांत शिंदे यंदा दिल्लीत पोहोचणार नाहीत. आमच्या सामान्य कार्यकर्ता असलेल्या वैशाली दरेकर या गद्दारी आणि अहंकार यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय लोकांचा आहे.
हेही वाचा..“खासदार करणारेच शिवसैनिक श्रीकांत शिंदेंचा पराभव करतील,”उमेदवारी जाहीर, ठाकरेंची वाघीण कडाडली
दरम्यान, लोकसभेची घोषणा झाल्यानंतर महायुतीत अनेक वाद चव्हाट्यावर आले आहेत. हिंगोलीत हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यात आली. तर दुसऱ्या बाजूला यवतमाळ-वाशिम लोकसभेतून विद्यमान खासदार भावना गवळी यांची हाकालपट्टी करण्यात आली. नाशिक तसेच इतर लोकसभा मतदारसंघातही अशीच परिस्थिती बघायला मिळत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ठाकरेंवर दबाव टाकण्याची कोणाची हिमंत झाली नाही, आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो..!” दानवेंनी डिवचलं
हेही वाचा..‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,”आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं आवाहन
हेही वाचा…“घड्याळ तात्पुरतं, अन् वेळ वाईट”, कोर्टाने फटकारलं, शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं
हेही वाचा…“20 वर्षांपासून आबंडेकरांचा पराभव, यंदीही निवडणुकीच्या रिंगणात,”अकोल्यात पुन्हा तिरंगी लढत अटळ
हेही वाचा…“दिलेली उमेदवीरीही कापतात अन् सेनापती म्हणून बसवलेले बोलके बाहुले सगळं गुपगुमान ऐकतात”, शिंदेंना डिवचलं