पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत बुधवारी नाट्यपुर्ण घटना घडल्या. हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे हिंगोलीतून दिलेले तिकीट कापण्यात आले. तर पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यांच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली. मात्र दिलेले उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदेंवर आल्याने उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा दबाव असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून आता ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदेंना चांगलचा फैलावर घेतलं आहे.
हेही वाचा..“खासदार करणारेच शिवसैनिक श्रीकांत शिंदेंचा पराभव करतील,”उमेदवारी जाहीर, ठाकरेंची वाघीण कडाडली
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातील अनेक विद्यमान खासदारांची उमेदवारी काढून घेण्यात आली. तर हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करूनही उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदेंवर आली. यावरून शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता. तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. असा टोला दानवेंनी लगावला आहे.
तसेच जाहीर झालेली उमेदवारी भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धव साहेबांवर टाकण्याची हिमंत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो..! लोकसहा हा तर ट्रेलर आहे. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पुर्ण पिक्चर दाखवतील. असा घणाघात देखील दानवे यांनी लगावला.
हेही वाचा…“आम्ही त्यांच्याहून जास्त हार्ड बोलू शकतो,” कॉंग्रेसचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
दरम्यान, हेमंत पाटील यांना जाहीर झालेल्या उमेदवारीला हिंगोलीतील भाजपच्या स्थानिक नेत्यांचा विरोध होता. त्यामुळेच त्यांचे तिकीट कापण्यात आल्याचे सांगण्यात येतेय. पाटील यांनी उमेदवारीसाठी शिंदेंकडे जोरदार मोर्चेबांधणी केली होती. यावेळी तुमच्या हेमंतवर कोणताही अन्याय होणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिला. मात्र काल अचानक त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने चर्चांना उधाण आलं. मात्र त्यानंतर लगचेच भावना गवळी यांच्या जागी यवतमाळ-वाशिममध्ये त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव… https://t.co/wnfiFHj3VR
— Ambadas Danve (@iambadasdanve) April 3, 2024
READ ALSO :
हेही वाचा..‘मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आण्णांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा,”आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचं आवाहन
हेही वाचा…“घड्याळ तात्पुरतं, अन् वेळ वाईट”, कोर्टाने फटकारलं, शरद पवार गटाने अजितदादांना डिवचलं
हेही वाचा…“20 वर्षांपासून आबंडेकरांचा पराभव, यंदीही निवडणुकीच्या रिंगणात,”अकोल्यात पुन्हा तिरंगी लढत अटळ
हेही वाचा…“दिलेली उमेदवीरीही कापतात अन् सेनापती म्हणून बसवलेले बोलके बाहुले सगळं गुपगुमान ऐकतात”, शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“मै मैरी झांशी नही दुंगी”, तिकीट कापलं, भावना गवळी आक्रमक, आज उमेदवारी अर्ज भरणार ?