मुंबई : आम्ही वाटाघाटीत ज्या ४ जागा ठरल्या त्यावर उमेदवार दिले आहेत. २ जागा मित्रपक्षांना तिथे लढा सांगितलं आहे. त्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई या जागांचा समावेश आहे. आमचे कार्यकर्ते ही जागा शिवसेनेचीच असल्याप्रमाणे मेहनतीने प्रचार करतील. रामटेकची जागा शिवसेनेची होती. ती आता कॉंग्रेसला दिली आहे. कोल्हापुराच्या बाबतही तेच केलं. त्यामुळे कॉंग्रेसने सांगलीच्या जागेचा विचार करणं सोडून द्यावं. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. त्यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलंय.
हेही वाचा…पक्ष फुटीत निष्ठावंत राहिल्या, आता लोकसभेची लॉटरी, श्रीकांत शिंदेंच्या विरोधात ठाकरेंची वाघीण मैदानात
सांगलीची जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सांगली, भिवंडी आणि मुंबईच्या जागेवर संध्याकाळी बैठक होईल. आज हा विषय आमच्याकडून संपवण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्ही मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा निभावण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांच्याहून जास्त हार्ड बोलू शकतो, परंतु आम्ही कॉंग्रेसी आहोत. सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. चर्चेतून मार्ग काढला जाईल. अशी अपेक्षा देखील नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“भाजपने तिकीट नाकारलं, ठाकरे गटात प्रवेश, पण ठाकरेंनी घोषीत केला ‘हा’ वेगळाच उमेदवार”
दरम्यान, पुढे बोलतांना पटोले म्हणाले की, जिथं उमेदवार नाही, मेरीट नाही तिथे आग्रही राहू नये ही आमची भूमिका आहे. भाजपला हद्दपार करण्यासाठी आम्ही लढत असून शरद पवार ज्येष्ठ नेते, उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते कॉंग्रेसची भूमिका समजून घेतली. महाविकास आघाडीत कुणाला जास्त जागा मिळाली हे महत्वाचे नाही. आकडे महत्वाचे नाही. मेरीटच्या आधारे आम्ही काम करतोय. आम्ही कुणाकडे मैत्रीचा हात पुढे करत असू तर मैत्री पुर्णपणे निभावण्याचा प्रयत्न करतो. असेही नाना पटोले म्हणाले.
यातच वर्धाला शरद पवारांकडे उमेदवार नव्हता. तिथे आमचा उमेदवार त्यांनी घेतला. ज्याठिकाणी मेरीट नाही तिथे आग्रही राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं या आधारे हे निर्णय व्हायला हवेत. अजूनही सामोपचाराने चर्चा करायला तयार आहोत. जागावाटपाचा वाद सामोपचाराने सोडवू. जागावाटपाचा हा शेवटचा टप्पा असेल. उद्धव ठाकरे शिवसैनिक आहेत ते त्या भाषेत बोलतील. आम्ही काँग्रेस आम्ही आमच्या भाषेत बोलू. भाजपाला हरवण्यासाठी मेरिटवर निर्णय घ्यावा हीच आमची भूमिका राहिली आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…उमेदवारी जाहीर होऊन पत्ता कट होणार ; शिंदेंवर नामुष्की, हेमंत पाटलांच्या जागी ‘हा’ उमेदवार जाहीर ?
हेही वाचा…प्रणिती शिंदेंचं सोलापुरात ताकद वाढली, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपचा पाठिंबा जाहीर
हेही वाचा…दिंडोरीत बंडखोरीचे मोठे संकट, महायुतीसह महाविकास आघाडीची वाढली डोकेदुखी
हेही वाचा..“दुर्दैवाने किमंत मिळाली नाही” अन्, ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटलांनी भावनांना वाट करून दिली
हेही वाचा…“समोर पाचशे कोटींचा मालक, अन् त्यांच्यासमोर आपल्याला लढायचं,” राणांच्या विरोधात कडूंनी ठोकला शड्डू