जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी काही विद्यमान खासदारांना डावल्यानंतर महायुतीत आता मोठा विस्फोट होतांना दिसत आहे. काही ठिकाणी थेट उमेदवार बदलण्याची मागणी करतांना दिसत आहेत. तर काही ठिकाणी ज्या विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. ते आता बंडाची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. यातच आता जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापल्यानंतर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या जागी आता भाजपने स्मिता पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे जळगावात मोठा राजकीय भुंकप होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“भाजपच्या उमेदवाराला अजितदादांच्या कार्यकर्त्यांचा विरोध, महायुतीत वाद आणखी वाढतच चाललाय”
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना नाकारून स्मिता वाघ यांना भाजपने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर उन्मेष पाटील भाजपवर नाराज असल्याचे दिसून आले, याबाबत त्यांनी वारंवार आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यानंतर आता पाटील थेट ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या माध्यमातून भांडुपच्या घरी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी पाटील दाखल झाले आहेत. परंतु अजूनही भेट झाली नसल्याचे माहिती समोर आलीय.
उन्मेष पाटील यांनी देखील आपण संजय राऊतांची भेट घेत असल्याची कबुली दिली आहे. तर उन्मेष पाटील भेट घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. दुसऱ्या बाजूला जळगाव लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडे आला आहे. याठिकाणी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे माजी महापौर कुलभुषण पाटील, ललिता पाटील निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे उन्मेष पाटील जर ठाकरे गटात आले तर त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…महायुतीतील जागावाटपाचा प्रश्न अजूनही तसाच, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक
दरम्यान, उन्मेष पाटील महाविकास आघाडीत दाखल झाल्यास महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जळगाव हा मागील कित्येक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला राहिलेला आहे. १९९९ कॉंग्रेसचे उमेदवार उल्हास पाटील यांचा पराभव करत याच मतदारसंघातून वाय जी महाजन सर निवडून आले होते. त्यानंतरच्या १९९९ च्या निवडणुकीतही ते विजयी झाले होते. तर २००४ आणि २००९ साली भाजपच्या तिकीटावरून ए. टी. नाना पाटील विजयी झाले होते. तर २०१९ साली भाजपने उन्मेष पाटील यांना उमेदवार दिली होती. तर उन्मेष पाटील यांना २०१९ साली उमेदवारी दिली. मात्र २०२४ साली त्यांना नाकारण्यात आले.
मागील चार लोकसभा निवडणुकांचा इतिहासा पाहिला तर दोन उमेदवार सलग निवडून आले आहेत. यावेळी उन्मेष पाटील यांना तिकीट देण्यात आले नाही. यातच मागील पाच वर्षात उन्मेष पाटील यांनी मतदारसंघात चांगली कामे केली आहेत. नागरिकांचा कल देखील उन्मेष पाटील यांच्याकडे अधिक झुकला आहे. त्यामुळे पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल अशी आशा देखील जळगावाच्या लोकांना होती. मात्र यावेळी भाजपने आपला उमेदवार बदलला आहे. त्यामुळे याठिकाणी आता चित्र वेगळे दिसून लागले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“यंदा गर्जना महायुतीच्या नावाचीच असणार”, आढळरावांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा शिरूरमध्ये निर्धार
हेही वाचा…अकोल्यात आबंडेकरांविरोधात कॉंग्रेसने दिला उमेदवार ; डॉ. अभय पाटील यांना तिकीट,आंबेडकरांची दुहेरी भूमिका
हेही वाचा…“सोलापुर लोकसभेचे एक मत मोदीजींच्या पारड्यात पाडा, सर्वांनी एकजुटीने लढा,” सुभाष देशमुख यांचं आवाहन
हेही वाचा…पुण्यात फक्त आणि फक्त कमळ फुलणार ; वडगाव शेरीतील मेळाव्यात महाविजयाचा निर्धार
हेही वाचा…“भाग गया रे भाग गया रे अशोक चव्हाण भाग गया”, अन् प्रचारासाठी आलेले अशोक चव्हाण धुम ठोकून पळाले
हेही वाचा…शिवसेना शिंदे गटाचे ‘दोन’ उमेदवार बदलणार ? भाजपसह मित्र पक्षांच्या नेत्यांचा उमेदवारीला प्रखर विरोध