पुणे : केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर कारवाई सुरु आहे. या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी, एका नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून, “केवळ विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर केला जात आहे. काळ येतो-जातो, काळ जाईल तेव्हा त्यात सर्व दुरुस्त्या केल्या जातील,” असा सज्जड इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
“सगळ्या दुरुस्त्या केल्या जातील”, ईडीच्या कारवाईवरून पवारांचा सूचक इशारा
त्यांच्या विधानावर आता भाजपकडून मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिल असून, “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात एकाचवेळी ईडीच्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? पूर्वीच्याकाळी भानगडी करणारेच सरकारमध्ये असतील तर कशाला ईडी कारवाई करेल? बिनदिक्कत सुरू होतं. कारण सैयां भये कोतवाल, अब डर काहे का? आता परिस्थिती बदलली त्यामुळे कारवाया होत आहेत”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष @PawarSpeaks म्हणतात एकाचवेळी 'ईडी'च्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का?
पूर्वीच्याकाळी भानगडी करणारेच सरकारमध्ये असतील तरकशाला ईडी कारवाई करेल? बिनदिक्कत सुरू होत कारण सैयां भये कोतवाल, अब डर काहे का?
आतापरिस्थिती बदलली त्यामुळे कारवाया होत आहेत— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 7, 2021
दरम्यान, “अनिल देशमुख कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यांच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. या देशात महाराष्ट्रात एवढ्या प्रमाणात ईडीच्या केसेस वाचल्यात का कधी? एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक या सगळ्यांच्या विरोधात ईडीकडून कारवाया सुरू आहेत. ईडीचा वापर एक साधन म्हणून होत असून, हा वापर विरोधकांना नमवण्यासाठीच केला जात आहे. ठिक आहे. काळ येतो-जातो, काळ जाईल तेव्हा त्यात सर्व दुरुस्त्या होतील,” असा सूचक पवारांनी दिला होता.
“मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ”- चित्रा वाघ
तसेच, “गेल्या काही वर्षात देशातल्या लोकांना नवीनच यंत्रणा माहीती झाली असून, ही ईडी कुणाच्या कशी मागे लागेल सांगता येत नाही. राज्यातल्या नेत्यांना ईडीकडून त्रास दिला जात आहे. राज्यात जिथे गैरव्यवहार झाला असेल, तिथे चॅरिटी कमिशन आहे. गृहखातं आहे. या संस्था असताना ईडी जाऊन हस्तक्षेप करत असेल, तर हा राज्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे. यावर येत्या अधिवेशनात संसदेत आवाज उठवू,” अशी भूमिका त्यांनी मांडली होती.
Read Also :
- “संघर्षाचं कौतुक करायला हवं, पेढे काय वाटताय? हा आनंद तर…” राऊतांची खोचक टीका
- “ते कुठले डॉक्टर तपासावं लागेल,” मोहन भागवतांच्या विधानावर पटोलेंची टीका
- बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? भारती पवार
- ‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
- अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी – केशव उपाध्ये