पुणे : केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर कारवाई सुरु आहे. या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून, “केवळ विरोधकांना नमवण्यासाठीच ईडीचा वापर केला जात आहे. काळ येतो-जातो, काळ जाईल तेव्हा त्यात सर्व दुरुस्त्या केल्या जातील,” असा सज्जड इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा
“अनिल देशमुख कायदेशीर लढाई लढत आहेत. त्यांच्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. या देशात महाराष्ट्रात एवढ्या प्रमाणात ईडीच्या केसेस वाचल्यात का कधी? एकनाथ खडसे, अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक या सगळ्यांच्या विरोधात ईडीकडून कारवाया सुरू आहेत. ईडीचा वापर एक साधन म्हणून होत असून, हा वापर विरोधकांना नमवण्यासाठीच केला जात आहे. ठिक आहे. काळ येतो-जातो, काळ जाईल तेव्हा त्यात सर्व दुरुस्त्या होतील,” असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.
“बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, चंद्रकांत पाटलांचे शिवसेनेला थेट आव्हान
“गेल्या काही वर्षात देशातल्या लोकांना नवीनच यंत्रणा माहीती झाली असून, ही ईडी कुणाच्या कशी मागे लागेल सांगता येत नाही. राज्यातल्या नेत्यांना ईडीकडून त्रास दिला जात आहे. राज्यात जिथे गैरव्यवहार झाला असेल, तिथे चॅरिटी कमिशन आहे. गृहखातं आहे. या संस्था असताना ईडी जाऊन हस्तक्षेप करत असेल, तर हा राज्याच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे. यावर येत्या अधिवेशनात संसदेत आवाज उठवू,” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
सरकारने विश्वास संपादन करावा, त्यांच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही- राजू शेट्टी
तसेच, “मी अनेक वर्षे सत्तेतही आणि विरोधी बाकांवरही होतो. जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हाही सगळे अधिकारी मला भेटत होते. लोकशाहीत अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीशी संपर्क ठेवणं यात काहीच गैर नाही. पण जेव्हा त्यांच्याच गैरवापर होत असेल, तर ते चुकीचं आहे. त्यामुळे, अधिकारी माजी मुख्यमंत्र्यांना किंवा विरोधी पक्षांना भेटले तर त्यात काहीच गैर नाही. पण त्यांचा गैरवापर होणे, ही चिंतेची बाब आहे,” असं त्यांनी सांगितलं.
Read Also :
- मराठवाड्यात पावसाचे थैमान : परभणीत पुराच्या पाण्यात बैलजोडी गेली वाहून
- “ते कुठले डॉक्टर तपासावं लागेल,” मोहन भागवतांच्या विधानावर पटोलेंची टीका
- बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? भारती पवार
- अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी – केशव उपाध्ये
- … तर राज्यात लॉकडाऊन अटळ आहे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ दिवस