पुणे : तब्बल ८ वर्षांनंतर बेळगाव महापालिकेवर भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर, पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “बेळगावात ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार सीमाबांधवांचा आवाज दडपत आहे, ते पाहिलं की अंगावर काटाच उभा राहतो. तरीही आमचे लोक संघर्ष करतात, लाठ्या खातात, तुरुंगात जातात. त्याचं कौतुक असायला हवं, तिथे पेढे कसले वाटताय?” असा संतप्त सवाल त्यांनी भाजपला केला आहे.
मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही; तोंडघशी पडलेल्या संजय राऊतांचा संताप
तसेच, “इतक्या वर्षांपासून या इथे प्रशासक नेमलेला होता आणि एकाएकी निवडणूक घेण्यात आली? प्रचाराला देखील वेळ मिळाला नाही,” असं म्हणत त्यांनी निवडणूकीवर व निर्णयावर आक्षेप घेतला. तसेच, “पराभव घडला हे दुर्दैव! पण सीमाबांधवांचा आवाज ज्याप्रकारे दडपण्याचा प्रयत्न केला जातोय, ते पाहून अंगावर काटा उभा राहतो. शिवाजी महाराजांना आग्र्यात औरंगजेबाने कैद केल्यावर काहींना आनंद झाला होता, तसाच आनंद या पेढे वाटणाऱ्यांच्या चेहऱ्यावर मला दिसतो”, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
“बेळगाव तो झांकी है, मुंबई अभी बाकी है, चंद्रकांत पाटलांचे शिवसेनेला थेट आव्हान
दरम्यान, कालच्या निकालानांतर राऊत यांनी भाजपवर परखड शब्दांत टीकास्त्र सोडलं होतं. “बेळगावात मराठी माणसाच्या झालेल्या या पराभवाबद्दल आज महाराष्ट्रात ज्यांना उकळ्या फुटत आहेत, त्यांना इतकंच सांगतो, की महाराष्ट्रात आत्तापर्यंतच्या इतिहासात इतकी नादानी आणि नालायकपणा, मराठी माणसाच्या बाबतीत कुणी केला नव्हता. तुम्ही पेढे कसले वाटताय?” असा सवाल त्यांनी केला होता.
बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? भारती पवार
त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, “‘ज्यावेळी परिणाम चांगले असतात, त्यावेळेला ईव्हीएम चांगलं असतं आणि ज्यावेळी निकाल आमच्या बाजूने असतो, तेव्हा त्यांना ईव्हीएममध्ये घोटाळा वाटतो. हे स्वभावानुसारच आहे’, असा टोला लगावला होता. दुसरीकडे, धारवाड महापालिकेतही भाजपने विजय खेचून आणल्याने, निवडणुकीतील या विजयांमुळे भाजपला बळ मिळाले आहे. त्यामुळे, आता आगामी मुंबई महापालिकेमध्ये सत्ता आणण्याचे आता भाजपचे लक्ष्य असेल.
Read Also :
- “मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ”- चित्रा वाघ
- “सगळ्या दुरुस्त्या केल्या जातील”, ईडीच्या कारवाईवरून पवारांचा सूचक इशारा
- मराठवाड्यात पावसाचे थैमान : परभणीत पुराच्या पाण्यात बैलजोडी गेली वाहून
- “ते कुठले डॉक्टर तपासावं लागेल,” मोहन भागवतांच्या विधानावर पटोलेंची टीका
- ‘या’ ५ जिल्ह्यांना तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका, आरोग्यमंत्र्यांनी दिला सतर्कतेचा इशारा