पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीवारीची चर्चा सध्या जोरात आहे. पंकजा मुंडेही दिल्ली दरबारी दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. अशावेळी राज्यात भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदलाची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नसल्याची माहिती दिलीय. तसंच ही दिल्लीवारी फक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी असल्याचंही फडणवीस म्हणाले. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
भाजप प्रदेश अध्यक्ष बदलणार ? चंद्रकांत दादा चार दिवस दिल्लीत
भाजपमध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. नव्या मंत्र्यांच्या भेटीगाठीसाठी आम्ही दिल्लीला जात आहोत. तसंच महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी हा दौरा आहे. राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलण्याचीही चर्चा नाही. चंद्रकांत पाटील चांगलं काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. कृपया कंड्या पिटवू नका, असं देवेंद्र फजणवीस यांनी म्हटलंय. त्याचबरोबर मातंग, बोरड, चर्मकार, वाल्मिकी सुदर्शन समाजापर्यंत आरक्षण पोहोचलं नाही. ते त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वर्गवारी करावी लागेल. आज आरक्षणानंतरही अनेक समाज मागे आहे. त्यामुळे दीर्घकाळ आरक्षण सुरु ठेवावं लागेल. जो वंचित समाज आजही आरक्षणापासून दूर आहे. त्यांना कशाप्रकारे मुख्य प्रवाहात घेता येईल याबाबत विचार सुरु असल्याचंही फडणवीस म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर काँग्रेसकडून ओबीसींच्या 30 टक्के उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट देण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्याबाबत विचारलं असता नाना पटोले काय म्हणाले हे ऐकलं नाही. मी त्यावर भूमिका मांडणार नाही. एवढंच सांगतो की भाजपची भूमिका स्पष्ट आहे. ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळत नाही तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
Read Also :
- … तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना ३०% जागा देणार, काँग्रेसची मोठी घोषणा
- “दगडातूनही तेल काढू शकतात, भलताच ब्रिलियंट माणूस”, राज्यपालांकडून गडकरींचं तोंडभरून कौतुक
- महापालिका रणधुमाळी : आदित्य ठाकरेंकडे महापालिकेची जबाबदारी तर, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार
- संजय काका पाटीलांसारखा घातकी मित्र आयुष्यात नको, बळजबरीने निवडणुकीला उभे केले आणि मग पाडले
- मनसेच्या गोटात हालचालींना वेग; नाशिक -पुणेनंतर राज ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर