नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवणुकांतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्याने, ओबीसी समाजात रोष पसरला आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाने यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीला धारेवर धरले असून, आरक्षण पुन्हा मिळवून दिले जात नाही तोवर निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्र घेतला आहे. तसेच, आरक्षण मिळाले नाही तर निवडणुकीत सर्व ठिकाणी ओबीसी उमेदवार देण्याची घोषणा त्यांनी केली.
९ मिनिटांच्या क्लिपमध्ये अखेर दडलंय तरी काय? भाजप मनसे युतीच्या प्रवासातील दुसरा एपिसोड
या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनेही मोठी घोषणा केली असून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण दिलं गेलं नाही तर काँग्रेसकडून ओबीसींच्या ३०% उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट देण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे. त्यामुळे आता भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही ओबीसी उमेदवारांसाठी घोषणा केल्याने ओबीसी समाजाची मते राखण्यात या दोन्ही पक्षांनी पुढाकार घेतले असल्याचे दिसते आहे.
भाजप प्रदेश अध्यक्ष बदलणार ? चंद्रकांत दादा चार दिवस दिल्लीत
यावेळी या निर्णयाबाबत अधिक बोलताना नाना पटोलेंनी, “ओबीसींना त्यांचं स्थगित झालेलं राजकीय आरक्षण पुन्हा मिळेल की नाही याबाबत संभ्रम आहे. पण आरक्षण मिळालं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस, ओबीसींना २७ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ३० % जागा देणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही पक्षाकडून ओबीसींचाच मुद्दा असेल”, असंही स्पष्ट केलं.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाकडून मोदी सरकारवर या मुद्द्यावरून निशाणा साधला जात असून, यावेळीही केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना पटोलेंनी, “काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण देशात आजही ओबीसी समाज हक्काची लढाई लढत आहे. आपण एकत्रित नसल्याने आपले अधिकार आपल्याला मिळत नाहीयेत. या ताटं वाजवणाऱ्यांनी कधीही आपला विचार केला नाही”, असा टोला लगावला आहे.
Read Also :
- “दगडातूनही तेल काढू शकतात, भलताच ब्रिलियंट माणूस”, राज्यपालांकडून गडकरींचं तोंडभरून कौतुक
- महापालिका रणधुमाळी : आदित्य ठाकरेंकडे महापालिकेची जबाबदारी तर, वरुण सरदेसाईंकडे युवा सेनेचा भार
- संजय काका पाटीलांसारखा घातकी मित्र आयुष्यात नको, बळजबरीने निवडणुकीला उभे केले आणि मग पाडले
- मनसेच्या गोटात हालचालींना वेग; नाशिक -पुणेनंतर राज ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर
- पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता द्या’ महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपेना पत्र