मुंबई: मुंबईत सेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन लढावं आणि ती जिंकून दाखवावी”, असं आव्हान काल चंद्रकांत पाटील यांनी केल होत. चंद्रकांतदादांच्या चॅलेंजला आज संजय राऊत यांनी जशास तसं प्रत्युत्तर देताना दादांच्या दुखऱ्या नसेवरच बोट ठेवलं, तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?, असं म्हणत त्यांनी दादांवर शाब्दिक टीका केली.
हे पण वाचा: पुण्यातील कोरोना निर्बंधांवरून राज्य सरकार आणि पुणे महापौर पुन्हा एकदा आमनेसामने
त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला आहे. यासंदर्भात बोलताना मुश्रीफ म्हणाले की, ‘स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् संजय राऊतांना कसलं आव्हान देताय; अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली आहे.
हे पण वाचा: कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही खोचक टीका केली. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांच्याबाबत चंद्रकांत पाटील बोलतात हे आक्षेपार्ह आहे. पाटील यांना कोल्हापुरात जागा मिळाली नाही. अन् पवारांना माढामधून मागे घालवल्याचे बोलतात. येत्या काळात असं बोलणं आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देतानाच स्वत:चं गाव राखता आलं नाही आणि संजय राऊत यांना कशाला आव्हान देता?, असा सवाल मुश्रीफ यांनी केला.
हे पण वाचा: भाजपच्या ३ बड्या नेत्यांची दिल्लीवारी, राज्याच्या नजरा लागल्या राजधानीकडे; राजकीय वर्तुळात चर्चा
चंद्रकांत पाटील काय म्हणाले
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना, या भेटीत काय चर्चा झाली याचा तपशील सांगितला. यावेळी त्यांनी, राज ठाकरेंच्या अंगणातून थेट शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुंबईत सेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन लढावं आणि ती जिंकून दाखवावी”, असं आव्हान दिलं आहे.
Read Also :
- पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलता द्या’ महापौर मुरलीधर मोहोळ यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंना पत्र
- मनसेच्या गोटात हालचालींना वेग; नाशिक -पुणेनंतर राज ठाकरे आता मराठवाडा दौऱ्यावर
- मोठी बातमी: देशात ओबीसींना वगळून निवडणुका होणे अशक्य – विजय वडेट्टीवार
- ‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही काही बोललो का?’, राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
- साहेब तुम्ही, पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा, अशीही जनतेची मागणी, राष्ट्रवादीचा मोदींना टोला