मुंबई : देशाचा यंदाचा स्वातंत्र्यदिन हिरक की अमृतमहोत्सव यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गोंधळ झाला. त्यातच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना भाजपात हायव्होल्टेज ड्रामा झाला. त्यानंतर आता देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहण्यासाठी भाजप ७५ हजार पत्र पाठवणार आहे. कालपासून अमरावती शहरातून या अभियानाची सुरुवातही झाली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल
देश कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय याची आठवण मुख्यमंत्र्यांना नसल्याचा आरोप भाजपने याआधी केला. आता त्यानंतर भाजप पत्र लिहून ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचं मुख्यमंत्र्यांना स्मरण करुण देणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चा उद्धव ठाकरे यांना ७५ हजार पत्र लिहिणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या याच गोंधळावर बोट ठेवत केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्षेपार्ह वक्तव्य करुन गेले. त्यांनंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांना किंमत चुकवावी लागली. मंगळवारी त्यांना अटक झाली आणि काही तासानंतर न्यायालयाच्या जामीनानंतर त्यांची सुटका झाली. नारायण राणे आणि शिवसेना वादानंतर भाजप आता गांधीगिरीची पर्याय स्वीकारणार आहे.
“राजकीय पक्षात मतभेद असतात पण…”, भाजप खासदार गिरीश बापट यांचा राणेंना घरचा आहेर
राज्यभरातून युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना ७५ हजार स्मरणपत्र पाठवणार आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसंच युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनीही ट्विट करुन भाजपच्या गांधीगिरी अभियानाविषयी माहिती दिली आहे.
Read Also :
- भाजपमधील घुसखोरांनी माहौल बिघडवला, भाजपला शुद्धीकरणाची गरज – संजय राऊत
- एकनाथ खडसेंना मोठा धक्का: ५ कोटी ७३ लाखांची मालमत्ता ED कडून जप्त
- भाजपला समर्थन करणाऱ्या ‘राष्ट्रवादी’ची एका रात्रीत पुन्हा पलटी; ॲमेनिटी स्पेसबद्दल भूमिका बदलली
- अटक, लीलावतीनंतर योद्धा पुन्हा मैदानात; नारायण राणेंची जन आशीवार्द आज रत्नागिरीतून सुरू
- सांगलीच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांना हटवा! भाजपची आक्रमक मागणी