मुंबई : महाड मध्ये केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी, मुख्यमंत्र्याच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर, त्यांना अटक करण्यात आली आणि रात्री त्यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्यांनतर राणेंनी आपल्या विरोधातील सर्व गुन्हे रद्द व्हावेत आणि कोणतीही कारवाई केली जाऊ नये, यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर, न्यायालयाने १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे लीलावती रुग्णालयात दाखल
दरम्यान, राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर भाजपकडून पक्षाची भूमिका स्पष्ट करताना, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “आम्ही नारायण राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत,” असं विधान केलं. त्यानंतर आता भाजप नेते व खासदार गिरीश बापट यांनी राणेंच्या वक्तवव्यावर प्रतिक्रिया दिली असून, “राजकीय पक्षात मतभेद असतात, पण बोलताना पथ्य पाळली पाहिजेत,” या शब्दांत त्यांनी राणेंना घरचा आहेर दिला आहे.
“आम्ही आणि मोदी पाहून घेऊ, एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही,”
“नारायण राणे असतील किंवा इतरही पक्षातील कोणी नेते असतील, त्यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही, पण नंतर अनेक गोष्टीत अडचणी दिसतात आणि मग शेवटी त्याचं रुपांतर, नको त्या गोष्टीत होतं. या गोष्टी सर्वच पक्षांनी टाळलं पाहिजे,” असं देखील त्यांनी म्हटलं. तसेच, “सामान्य जनतेला जे आवडतं तेच केलं पाहिजे. जनतेत जाऊन कामं केली पाहिजेत,” असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी त्यांनी, राज्य निवडणूक आयोगाच्या एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध केला आहे.
आणखी एका भाजप नेत्याचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात, शिवसेनेकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दुसरीकडे, दोन दिवसांच्या तणावपूर्ण घटना क्रमानंतर राणे यांनी, ‘जन आशीर्वाद’ यात्रेबाबत पत्रकार परिषदेत बोलताना, “हि यात्रा सुरूच राहणार! अशी घोषणा केली आहे. मात्र, राज्य सरकारने सिंधुदुर्गात ७ दिवसांची संचारबंदी लावलेली असल्याने, आता पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राणे आणि सोबतच शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून ‘जन आशीर्वाद’ यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार आहे.
Read Also :
- कोरोना संकटात महाराष्ट्राला सावरण्याचं श्रेय माझ्या एकट्याचं नाही – उद्धव ठाकरे
- “एखाद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानखाली मारेन असं म्हटलं तर..” – राऊत कडाडले
- “रडायचं नाही…भिडायचं आणि जिंकायचं, तहसीलदार ताई आम्ही तुमच्या सोबत”
- शिवसेना अडचणीत येणार? रश्मी – उद्धव ठाकरेंविरोधात भाजपची पोलिसांत तक्रार दाखल; कारवाई होणार?
- अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, अनिल परबांच्या व्हिडीओची घेतली दखल