नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प महायुतीने डोळ्यासमोर ठेवला आहे. कोणत्याही परिस्थितीत आपलाच उमेदवार निवडून आला पाहिजे. या रणनितीवर भाजपने लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. याचाच परिपाक म्हणून मागच्या निवडणुकीच्या वेळी पराभूत झालेला उमेदवार देखील आपल्याकडे घेण्याचा चंग भाजपने बांधला आहे.
हेही वाचा…“घाबरू नका, आजही बाप माणूस माझ्यापाठीमागे ढाल बनून उभा आहे”, Ed च्या चौकशीआधी रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन
लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात भाजपने सुक्ष्म नियोजन केले आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २००९ ते २०१४ साली भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण प्रचंड मतांनी निवडून आले होते. परंतु २०१९ चा महोल बघता २०१४ च्या निवडणुकीत ज्या उमेदवारांनी भाजपच्या विरोधात निवडणुक लढवली. त्या राष्ट्रवादीच्या भारती पवारांना भाजपने पक्षात घेऊन उमेदवारी दिली. अन् ही जागाही आपल्या ताब्यात ठेवली. यापुढे जाऊन भारती पवारांकडे केंद्रीय राज्य मंत्रीपदाचीही जबाबदारी दिली.
हेही वाचा…“मुंबईत मराठ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर संपुर्ण महाराष्ट्रात….” जरांगे पाटलांनी सरकारला दिला पुन्हा इशारा
रावेर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार उल्हास पाटील यांचा देखील भाजप अशाच पद्धतीने वापर करणार असल्याचं दिसून येत आहे. उल्हास पाटील यांनी याठिकाणी लोकसभा निवडणुक लढवली. परंतु भाजपच्या विद्यामान खासदार रक्षा खडसे यांनी त्यांचा पराभव केला. परंतु आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. रक्षा खडसे यांच्याकडे लोकांचा पाहिजे तितका कल नसल्याने भाजपने आता उल्हास पाटलांनाच भाजपमध्ये घेण्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघात उल्हास पाटील यांची कन्या केतकी पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देणार येणार असल्याची माहिती समोर आलीय. या चर्चांना उधाण येताच कॉंग्रेसने उल्हास पाटलांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केले आहे.त्यामुळे आता उल्हास पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीत दक्षिण मध्य लोकसभेची जागा पुन्हा ठाकरेंकडे जाणार असल्याने कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मागच्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांनी शिवसेनेचे विद्यामान खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात निवडणुक लढविली होती. त्यामुळे आता त्यांना पुन्हा याठिकाणी उमेदवारी देणे शक्य नसल्याने त्यांनी शिंदेंची वाट धरली. या अशा अनेक घडामोडीवरून असं लक्षात येतं की, लोकसभा मतदारसंघात आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी तसेच जिंकण्यासाठी भाजपने कशापद्धतीने नियोजन केले आहे.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निकाल
२००९ हरिश्चंद्र चव्हाण भाजप ( विजयी ) विरूद्ध नरहरी झिरवळ ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )
२०१४ हरिश्चंद्र चव्हाण भाजप ( विजयी ) विरूद्ध भारती पवार ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )
२०१९ भारती पवार भाजप ( विजयी ) विरूद्ध धनराज महाले ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल
२००४ मिलिंद देवरा ( कॉंग्रेस पक्ष ) विजयी विरूद्ध जयवंतीबेन मेहता (भाजप)
२००९ मिलिंद देवरा ( कॉंग्रेस पक्ष ) विजयी विरूद्ध मोहन रवाळे (शिवसेना)
२०१४ अरविंद सावंत शिवसेना विजयी विरूद्ध मिलिंद देवरा ( कॉंग्रेस पक्ष )
२०१९ अरविंद सावंत शिवसेना विजयी विरूद्ध मिलिंद देवरा ( कॉंग्रेस पक्ष )
रावेर लोकसभा मतदारसंघ निकाल
2009 हरिभाऊ माधव जवाळे विजयी ( भाजप ) विरूद्ध रविंद्र पाटील ( कॉंग्रेस )
२०१४ रक्षा खडसे विजयी ( भाजप ) विरूद्ध मनिषदादा जैन ( राष्ट्रवादी कॉंग्रेस )
२०१९ रक्षा खडसे विजयी ( भाजप ) विरूद्ध उल्हास पाटील ( कॉंग्रेस )
READ ALSO :
हेही वाचा…उल्हास पाटिल सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत, माजी खासदार उल्हास पाटलांची पहिली प्रतिक्रिया.. म्हणाले..
हेही वाचा…“पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी निवडणुकीचे कागदपत्र कपाटातून गायब”, शरद पवार गटाचा मोठा आरोप
हेही वाचा…नितेश राणेंच चिथावणीखोर ट्विट अन् मीरा रोडवर वाढवला पोलिसांचा मोठा फौजफाटा
हेही वाचा…“30 वर्ष भाजप बरोबर राहून निर्लज्ज झालो नाही तर काँग्रेसबरोबर राहून काय काँग्रेस होणार”? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हेही वाचा…“प्रभू श्रीरामांची ‘ती’ संयमी योद्धा ही उपाधी आता उद्धव ठाकरेंना शोभून दिसतेय,”