पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला निघालेले मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेचा चौथा दिवस आहे. आज रांजणगाव गणपती येथून मनोज जरांगे पाटलांची पदयात्रा सुरू झाली आहे. तर आजचा मुक्काम हा पुण्यातील खराडी भागात होणार आहे. त्यामुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था टप्प होणार असून अनेक मार्गावरील वाहतूक दुसरीकडे वळविण्यात आली आहे. यातच बोलतांना मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे.
हेही वाचा…राम मंदिराच्या सोहळ्यापुर्वी दोन गटात मोठा राडा, श्रीरामाचे झेंडे असलेल्या गाड्या फोडल्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर
मुंबईत मराठे येताहेत, कुणाला डवचाडवची केली तर मराठे मुंबईतून तर उठणार नाहीच, परंतु संपुर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यावर शांततेत मराठे दिसणार. सरकार शाहाणं असेल तर आमचं आंदोलन हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका. मला गोळ्या घालण्याचा प्रयत्न केला. तर वर्षांनुवर्ष मराठे रस्त्यावर दिसतील. अशा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे.
हेही वाचा….अखेर प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान..! उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भीतल क्युरेटिव्ह याचिकेवर उद्या सुप्रिम कोर्टात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. मराठा समाजाच्या वतीने यावर सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सुप्रिम कोर्टात काय सुनावणी होणार ? आणि यावर काय निर्णय लागणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या यांची डोकी फिरली की तुमची..,” शरद पवार गटाने सुनील तटकरेंना दिला इशारा
हेही वाचा….कॉंग्रेसच्या माजी खासदारांचं पक्षातून निलंबन, भाजपमध्ये प्रवेश, पुढील लोकसभेत रक्षा खडसेंचा पत्ता कट ?
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!
हेही वाचा…राम मंदिर सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, मोदींच्या समोरच महाराजांचा अपमान