जळगाव : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हासपाटील यांना कॉंग्रेसमधून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील व कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यावर निलंबणाची कारवाई केली आहे. तशा पद्धतीचं पत्र देखील पटोले यांनी दिले आहे. त्यावर आता उल्हास पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मुंबईत मराठ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर संपुर्ण महाराष्ट्रात….” जरांगे पाटलांनी सरकारला दिला पुन्हा इशारा
कॉंग्रेस पक्ष सोडण्याचा आपला कोणताही विचार नव्हता. परंतु कॉंग्रेस पक्षाने आपल्याशी कोणतीही चर्चा न करता एकाधिकारशाहीने निलंबणाची कारवाई केली आहे. त्यामुळे आता आपल्याकडे कोणताही पर्याय नाही. त्यामुळे दोन दिवसांत आपण दुसऱ्या पक्षात प्रवेशबाबत निर्णय घेणार आहोत. असे मत उल्हास पाटील यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मांडले. उल्हास पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी वर्षा पाटील आणि मुलगी केतकी पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
हेही वाचा…“आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या यांची डोकी फिरली की तुमची..,” शरद पवार गटाने सुनील तटकरेंना दिला इशारा
दरम्यान, अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला संपुर्ण देश आनंदात असतांना आम्ही देखील सहभागी झालो. त्यानंतर दुपारी घरी आल्यानंतर आपल्याला व आपल्या पत्नीला तसेच देवेंद्र मराठे यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत करण्यात आल्याचे पत्र मिळाले. त्यामुळे अत्यंत वाईट वाटले. गेले अनेक वर्ष कॉंग्रेसमध्ये कार्य करीत आहोत. त्यामुळे आपल्याला या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठांनी विचारणा करण्याची गरज होती. अशीही खंत उल्हास पाटील यांनी व्यक्त करून दाखविली.
तसेच नाना पटोले यांच्यासह जिल्ह्याच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी चर्चा न करता आपल्यावर ही चुकीची कारवाई केली. पक्षाने लोकशाहीला डावलून एकाधिकार पद्धतीने हा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसमधील लोकशाही संपलेली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्याबाबत आपली नाराजी आहे. असेही उल्हास पाटीलांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी निवडणुकीचे कागदपत्र कपाटातून गायब”, शरद पवार गटाचा मोठा आरोप
हेही वाचा…नितेश राणेंच चिथावणीखोर ट्विट अन् मीरा रोडवर वाढवला पोलिसांचा मोठा फौजफाटा
हेही वाचा…“30 वर्ष भाजप बरोबर राहून निर्लज्ज झालो नाही तर काँग्रेसबरोबर राहून काय काँग्रेस होणार”? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हेही वाचा…“प्रभू श्रीरामांची ‘ती’ संयमी योद्धा ही उपाधी आता उद्धव ठाकरेंना शोभून दिसतेय,”
हेही वाचा…“घाबरू नका, आजही बाप माणूस माझ्यापाठीमागे ढाल बनून उभा आहे”, Ed च्या चौकशीआधी रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन