मुंबई : घन आणि कचरा व्यवस्थापनाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे आणि राष्ट्रीय हरित लवाद कायद्याच्या कलम 15 नुसार पर्यावरणाची हानी झाल्यामुळे लवादने महाराष्ट्र सरकारला तब्बल 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. त्यावरून आता भाजप नेते आशिष शेलार यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मुख्यमंत्र्यांनी ‘लम्पी’ या जनावरांना होणाऱ्या आजाराकडे गंभीरतेने बघावं” अजित पवार
कचरा व्यवस्थापनात अपयशी ठरल्याने पर्यावरणाची हानी केल्याबद्दल राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला 12 हजार कोटींचा दंड ठोठावला आहे. प्रदुषणमुक्त वातावरण देणे ही राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची घटनात्मक जबाबदारी आहे. असे लवादाने म्हटलंय.
“लाडू-पेढे पळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड”; मुख्यमंत्र्यांची सभा चर्चेत
हा दंड दोन महिन्यात भरायचा आहे, मग आता सांग सांग भोलानाथ हा दंड पालिकांमध्ये सत्ता असलेल्यांकडून. अडीच वर्ष पर्यावरण मंत्री असलेल्यांकडून सोशल मीडियावर ‘पर्यावरण प्रेमाची झाडे’ लावणाऱ्या पेंग्विन सेनाप्रमुखांकडून वसूल करायचा का ? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी केला आहे.
Read also
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाडले, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शेकापला खिंडार!
- “उद्धव ठाकरेच समाजाला आणि लोकांना चांगली दिशा दाखवू शकतात”
- “दिलेला शब्द पाळतो अन् एकदा शब्द दिला तर मी स्वत: पण ऐकत नाही”; एकनाथ शिंदे
- “पैठणचा बोक्या खोक्यावर जाणारा नाही”; रावसाहेब दानवे यांचं वक्तव्य
- “मुस्लिम समाजाने आपली डोके शाबुत ठेऊन उद्धव ठाकरेंच्या मागे उभे राहा”; भास्करराव जाधव