मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे राहिलेल्या कार्यकर्त्यांना सोबत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत. यातच उद्धव ठाकरे यांना अनेक संघटना, कार्यकर्ते भेट देत पाठिंबा जाहीर करत आहेत. यातच शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
“जयंत पाटील, त्यानंतर शरद पवारांचं भाषण झालं, पण तुमचं भाषण नाही”, अजित पवार म्हणाले,.
भाजप मुंबई महापालिका निवडणुकीत दोन समाज लढवण्याचं काम करेल. त्यामुळे या लोकांसोबत जाऊन काही फायदा होणार नाही हे माझं सांगणं आहे. विशेष करून मुस्लिम समाजाने आपली डोके शाबुत ठेऊन उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहावे. उद्धव ठाकरेच समाजाला आणि लोकांना चांगली दिशा दाखवू शकतात असं भास्करराव जाधवांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकार सध्या ताकावर, मीठावर, दह्यावर आणि चटणीवरही जीएसटी लावला. आता आणखी कोणते अच्छे दिन आणणार आहात? असा टोला त्यांनी भाजपवर लगावला. उद्धव ठाकरे यांना वेदना झाल्या हे 40 लोक सोडून गेले तेव्हा आम्हाला देखील वेदना झाल्या. जेव्हा ते आजारी होते तेव्हा त्यांच्यावर वार करण्यात आला. त्यांचा आजार फार मोठा होता. मात्र ते जगदंबेच्या कृपेने चांगले झाले. जेव्हा गरज होती तेव्हा त्यांच्या हाताचा पाळणा करून त्यांना सांभाळायला हवे होते. मात्र तसे न होता त्यांना खाली खेचल्या गेले. असंही ते म्हणाले.
“गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर..;” अन् अजित पवार संतापले
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने मोठी रणनिती आखली आहे. येणाऱ्या सर्व निवडणुका ह्या भाजप आणि शिंदे गट एकत्रित लढणार असल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याचा फटका उद्धव ठाकरे यांना बसण्याची शक्यता आहे.
Read also
- “मुख्यमंत्र्यांनी ‘लम्पी’ या जनावरांना होणाऱ्या आजाराकडे गंभीरतेने बघावं” अजित पवार
- “लाडू-पेढे पळवण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड”; मुख्यमंत्र्यांची सभा चर्चेत
- “भुमरेंच्या मागच्या सभेला केवळ 110 लोकं होती, यावेळी तो फ्लॉफ शो होऊ नये म्हणून कदाचित”
- “काही दिवसांनी पटोलेंच भाजपमध्ये येतील पण आम्ही त्यांना घेणार नाहीत”
- “फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता”