पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचं अधिवेशन काल नवी दिल्लीतील एका स्टेडिअरवर पार पाडलं. मात्र यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोरच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात नाराजी नाट्यमय रंगल. अजित पवार यांच्या अगोदर जयंत पाटलांना भाषण करण्याची परवानगी दिली. त्यानंतर अजित पवार अचानक पणे निघून गेल्याने अनेकांना त्याचा धक्का बसला. त्यावर आता अजित पवार यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.
“राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष हा शरद पवार यांच्याच नावावर चालतो”; अजित पवारांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रीय अधिवेशनात मी न बोलल्याने माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ लावला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी दिल्लीत झाले. या अधिवेशनात अजित पवारांना बोलण्याची संधी दिली नाही अशा बातम्या माध्यमांनी दिल्या. मात्र मी न बोलल्याने माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ लावला, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रीय अधिवेशात राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे प्रांताध्यक्ष यांना बोलण्याची संधी असते. त्याठिकाणी मला कोणीही बोलू नका असे सांगितले नाही. वेळेअभावी मी एकटाच नाही तर सुनील तटकरे, वंदना चव्हाण तसेच इतर राज्यातील काही प्रतिनिधींनाही बोलता आले नाही. वस्तुस्थितीवर आधारित बातमी देण्याची जबाबदारी आपल्यासारख्या माध्यमांवर आहे असे अजितदादांनी स्पष्ट केले.
“आम्हाला असं वाटतं की आम्ही बारामती जिंकू”; चंद्रशेखर बावनकुळे
शासकीय कर्मचाऱ्यांना गर्दी जमवण्यासाठी सूचना करण्याची परिस्थिती आजच्या मुख्यमंत्र्यांवर आली हे राज्याचे दुर्दैव मुख्यमंत्र्यांच्या पैठण येथे झालेल्या सभेचा मोठा गौप्यस्फोट अजितदादांनी केला. बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्प औरंगाबाद-२ यांनी या सभेसाठी थेट पत्रकांच्या माध्यमातून प्रकल्पातील सर्व पर्यावेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या. महाराष्ट्रात अशी पद्धत कधीच नव्हती. मुख्यमंत्र्यांची राजकीय सभा असल्यास अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना बोलावण्याचा कोणताही संबंध नाही. जर गर्दी जमवण्यासाठी ही परिस्थिती आजच्या मुख्यमंत्र्यांवर आली असेल तर हे राज्याचे दुर्दैव असल्याचे अजित पवार म्हणाले.
“अजित पवार नाराज नाही, ते लघूशंकेला गेले होते”; नाराजी नाट्यमयानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
पुढे अजित पवारांनी अजूनही जिल्ह्यांसाठी पालकमंत्री नेमले नसल्याने सरकारला धारेवर धरले. नवीन पालकमंत्री आल्यानंतर जिल्हानिहाय निधीचे नियोजन कसे करावे याचा निर्णय घेतील असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. केवळ सहा महीने शिल्लक असताना या कालावधीत जर आलेल्या निधीतून काम झाले नाही तर ते पैसे लॅप्स होतात अशी माहिती अजितदादांनी दिली. तसेच यांना पालकमंत्री नेमण्यास कसा वेळ नाही? असा प्रश्न उपस्थित केला. याविषयी राज्याचे मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी अजितदादांनी केली. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होत आहे, याकडे कोणी लक्ष द्यायचे असा प्रश्न उपस्थित करून राज्याचा कारभार ज्या पद्धतीने सुरु आहे त्याचा अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
Read also
- “तेव्हा महाराष्ट्राचा अपमान झाल्याचा कांगावा कुणीतरी मोठ्या नेती ने केला होता”; चित्रा वाघ यांची सुळेंवर टिका
- “गर्दी जमवण्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल तर..;” अन् अजित पवार संतापले
- “शरद पवार अन् अजित पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू, त्यामुळे दानवसारखं बरळू नका”
- “शिवसेनेनं जे अडीच वर्षात पेरलंय, ते आता उगवतंय”
- “उद्धव ठाकरे भविष्यात पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने ‘शिवसेना’ फोडली”